Skip to main content

Posts

Showing posts from January, 2024

कृतज्ञता

बोलून सांगण्याचा प्रयत्न व्यर्थ होता मुक राहण्यातच थोडासा स्वार्थ होता. पोळले होते पाय तापल्या रस्त्यावरती थोड्याशा सावलीला तेव्हाच अर्थ होता. कृतज्ञतेने जपली आठवण सावलीची तिथे माझा देव आणि तिथे परमार्थ होता. नांदले होते रामराज्य कधी आपल्या इथे मनातला राम तेव्हा स्वतंत्र आणि समर्थ होता. -----अभय बापट ११/०१/२०२४

सांग ना !

तू "काय झालं ?" विचारल्यावर मी "काही नाही" असं उत्तर देतो तेव्हा मनाच्या आतमध्ये खोलवर खुप काही होत असतं,हे तुला कधीच कसं ग कळत नाही ? खुप काही गमावल्या सारखं वाटतं तेव्हा, ते तुळा कळू नये म्हणून तुझी नजर टाळतो मी,पण तेव्हा हवे असतात चार आपुलकीचे,धीराचे शब्द आणि थोडासा मायेचा ओलावा," शब्दावाचुन कळले सारे शब्दांचे पलिकडले" हे फक्त शब्दातच राहणार का ? कधी खरे होणार नाही, सांग ना! -- अभय बापट १०/०१/२०२४