तू "काय झालं ?" विचारल्यावर मी "काही नाही" असं उत्तर देतो तेव्हा मनाच्या आतमध्ये खोलवर खुप काही होत असतं,हे तुला कधीच कसं ग कळत नाही ?
खुप काही गमावल्या सारखं वाटतं तेव्हा, ते तुळा कळू नये म्हणून तुझी नजर टाळतो मी,पण तेव्हा हवे असतात चार आपुलकीचे,धीराचे शब्द आणि थोडासा मायेचा ओलावा," शब्दावाचुन कळले सारे शब्दांचे पलिकडले" हे फक्त शब्दातच राहणार का ? कधी खरे होणार नाही, सांग ना!
-- अभय बापट
१०/०१/२०२४
Comments
Post a Comment