Skip to main content

Posts

Showing posts from September, 2015

कैलासपती Canan boll

कैलासपती

व्याडेश्वर

व्याडेश्वर, गुहागर येथील पेशवेकालीन मंदिर,अनेक कोकणस्थांचे कुलदैवत. व्यडेश्वरलिंग स्थापण्यामागे "खरे" नावाचे गृहस्थ कारणीभूत आहेत. खरे हे गुजरात येथील कच्छ वासीय वेदशास्त्र संपन्न पंडीत.त्यांना एकदा दृष्टांत झाला त्यानुसार लिंग स्वरुपात देव गुहागर येथे असल्याच्या खाणाखुणा सांगितल्या.ते समुद्रमार्गे येथे आले.त्यांनी दृष्टांताच्या खाणाखुणा सांगितल्या. त्याची प्रचिती पाहण्यासाठी राजाने परशुने त्या दगडावर घाव घातला,त्यासरशी वीज चमकून दगडातून रक्त वाहू लागले,त्या दगडाचे तीन तुकडे झाले. दक्षिणेकडील जयगड येथील कराटेश्वर/क्राटेश्वर(ब्रह्म),गुहागर मध्य(विष्णु),तर उत्तरेकडे अंजनवेल येथे टाळुकेश्वर(शिव) अशी त्याची स्थाने बनली.

नाण्याची तिसरी बाजू-

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात असे आपण म्हणतो पण आपण त्या नाण्याची किंमत जोखण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून आपल्याला दोनच बाजू दिसतात पण नाण्याला तिसरी बाजू पण असते. दोन बाजूंनी कितीही घमेंड मारली तरी सत्य तिस-या बाजूला माहिती असते. तिसरी बाजू दोन बाजूंना बांधून ठेवण्याची भुमिका निभावत असते आणि ती भुमिका अत्यंत महत्वाची असते. ती तिसरी बाजू कधी तुमचा सहकारी असेल,कधी कुटूंबातील सदस्य,कधी मित्र तर कधी एखादा विचारही.पहिल्या दोन बाजूंची किंम्मत तिस-याच्या भक्कम पाठिंब्यावरच असेल. तुम्हाला कदाचित आत्ता त्याची गरज वाटत नसेल पण कठीण प्रसंगी तोच तुमच्या पाठीशी ठामपणे उभा असेल.तेव्हा त्याला दुर्लक्षित न करता कधीतरी त्याच्याही नजरेतून जग पहाण्याचा प्रयत्न जरूर करून बघा.

कुलस्वामीनी योगेश्वरी

योगेश्वरी असे म्हणतात की देवीचे पहिले नाव त्रिपुरासुंदरी, ती उपवर झाल्यावर परळी येथील वैद्यनाथाची निवड केली गेली. त्रिपुरासुंदरीस योग सामर्थ्य असल्याने ती आपले व वैद्यनाथाचे पूर्वीचे जन्म जाणून होती. त्यानुसार देवी पार्वती रुपात असताना तिचे महादेवाशी लग्न झाले. त्यावेळचा किस्सा तिला आठवला.तो रामायण कालातला. रावणाने सीतेचे अपहरण केले, रामाची अवस्था केविलवाणी झाली ती पाहून पार्वती महादेवांना म्हणाली,"ज्याचा पूर्णब्रह्म म्हणून तुम्ही उल्लेख करता त्याला आपली बायको कुठे आहे हे माहिती नसावे,त्याने केविलवाणे का व्हावे ?" महादेव म्हणाले रामाने मानवी देह धारण केलाय म्हणून तो भावनांचे खेळ खेळतोय. पार्वतीने रामाची परीक्षा घेण्याचे ठरवलेले व व्याकुळतेने सीतेला हाका मारणा-या रामासमोर ती सीता बनून आली,लक्ष्मण फसला पण राम म्हणाला,"माते कशाला हे श्रम घेतलेस?"पार्वतीचा गर्व परिहार झाला पण तिला सीतारूपात पाहिल्याने भगवान महादेवाने तिच्याकडे पत्नी म्हणछन पहाणे बंद केले, या प्रसंगाची तिला आठवण होती म्हणून ती वैद्यनाथाशी विवाहास तयार नव्हती. त्रिपारुसुंदरीने ठरवले कि अविवाहीत राह...