आपला इगो हा आपल्या नखांसारखाच असतो,आपल्या नकळत वाढत असतो.
एकदा वाढला की आपल्याला आणी आपल्या आसपास वावरणा-यांना त्रासदायक ठरतो.
हा वाढलेला इगो हाळूवार हाताने वेळीच कापून टाकावा लागतो,अगदी नखांप्रमाणेच.
आपणच जर असा वेळीच कापला नाही तर कधी एखाद्या कणखर गोष्टीची ठोकर लागली तर लागणारा मार जिव्हारी असतो,नखांप्रमाणेच.
आपला इगो आणी आपली नखं नेहमीच आटोपशीर ठेवा- सुखी व्हा, समाधानी रहा.
आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५
Comments
Post a Comment