Skip to main content

Posts

Showing posts from September, 2022

नवा भारत

कोण जाणे कसा हा बदलला देश आहे वाल्याने घेतला वाल्मिकीचा वेश आहे. भाव नाही भक्ती नाही प्रेम नाही अंतरी मुखामध्ये सदाचा रामनामाचा घोष आहे. पुर्वजांचे गोडवे अन आप्तांना क्लेश आहे स्वत:पुरतेच जगणे हाच एकमेव उद्देश आहे. वेचले अमाप सुख ज्या झाडांच्या सावलीत त्या झाडांना छाटण्याचा नवा आदेश आहे. -- अभय बापट १७/०९/२०२२

भुताचा जन्म

शहरातल्या गजबजलेल्या भागातील मी जूनी चाळ अनेकांच्या सुखदुःखाची साक्षीदार होत गेली अनेक वर्ष उभी आहे. मी अनेकांचे उभे राहणे आणि मोडून पडणे अलिप्तपणे माझ्या मनावर कोरुन ठेवले आहे.           कधीतरी स्वप्नांनी गजबजलेली आता भितीच्या धुसर छायेत एकाकी वाट बघते आहे माझा हा काळा इतिहास पुसून नव्याने नव्या रुपात पहाटेला सामोरी जाण्याची.           पहाट नेहमीच रम्य असते पण पुढे दिवसावर निसर्गाच्या लहरीपणाची पुटे चढत जातात आणि दिवस कधी संपतो असे होवून जाते, आपल्या हातात उरते फक्त वाट पाहणे, दिवस संपण्याची.           मला आठवतयं, माझ्या अंगणात अनेक कुटुंबे आनंदाने हासत खेळत होती, स्वप्न पाहात सुखाने झोपत होती.तात्याही त्यातलेच एक, एका खोलीत एकटे राहणारे.कुटूंब लांब कोकणात आईवडलांच्या सोबतीला.           गणपतीच्या आधीचे दिवस, धुंवाधार पाऊस, तात्यांनाही गणपतीचे वेध लागलेले पण मालकाचा नेहमीचाच आठमूठेपणा. डबलड्यूटी करुन दिवस भर तरच सुट्टी देईन अशी अट घातलेली.           तात्या उशीरा ध...

कलियुग

कपडे बदलून आले जेव्हा सारे कसाई हंबरेल का हो सांगा प्रेमाने गाय आता. दारात येऊन उभा रावण जेव्हा होता झोपेल का घरट्यात सुखाने माय आता. विश्वास हा विचार तुटून मनात गेला बांधेल का हो धागा मायेने ताय आता. नासून गेले बघ ओटीतच दुध सारे मिळाल का थोडी धगीने साय आता. चाललो होते रस्ता एकटी सुखाचा पोळून राठ झाले आगीने पाय आता. --- अभय बापट १४/०९/२०२२