Skip to main content

Posts

Showing posts from April, 2023

गोडवा तिळाचा

ओठावरती तीळ गालावर खळी आहे गोडी अमृताची त्यापुढे अधुरी आहे. गोडवा आहे मुळातच बोलण्यात तुझ्या कितीही बोललो तरी ही भेट अपुरी आहे. बघितलेस तू खोलवर डोळ्यात जेव्हा तेव्हाच समजले माझ्या स्वप्नांना मंजूरी आहे. घडली जेव्हा नजरभेट पहाटेला जागताना यौवनाने मुसमुसलेली तू लाघवी सूरी आहे. कोणासाठी अप्सरा कोणासाठी परी आहे माझ्यासाठी तू आपली गृहिणीच बरी आहे. ------ अभय बापट १४/०१/२०२३

आवरणे

चंबूगबाळ आवरावं म्हणतो  माणसांंना विसारावं म्हणतो सावरणाऱ्या पुस्तकांंना समर्थ हाती सोपवावं म्हणतो. थोडसं झुकावं म्हणतो ओझ उतरावं म्हणतो आपुलकीच्या धाग्यांंना निगुतीने सोडवावं म्हणतो. स्वप्न सोडावं म्हणतो रस्ता बदलावा म्हणतो शेवटच्या मार्गावर एकट्याने चालावं म्हणतो. आठवणीतल्या शब्दांना आतातरी जागावं म्हणतो, पुस्तकातल्या गोष्टींमधलं जग बघावं म्हणतो. कोणजाणे कसा असेल खडतर मार्ग काळोखाचा उजेडासाठी एकट्याने एकटंच जळावं म्हणतो. सोप्पं नसतं बोलण्याइतकं वागणं जगावेगळं संपण्यापूर्वी पुन्हा एकदा नव्याने तेवावं म्हणतो. शब्दांनी जोडावं म्हणतो मार्दव्यानं वागावं म्हणतो, मराठी बाणा सोडून माणसासारखं जगावं म्हणतो ----अभय बापट २५/०४/२०२३

नेहमीच...

नेहमीच काही नवे लिहावे सुचल्यानंतर नेहमीच कसे नवे सुचावे तू नसल्यानंतर, काही भावना, काही वेदना अक्षय असती नेहमीच कसे मन मारावे तू दिसल्यानंतर. पुन्हा पुन्हा घोळत राहतात शब्द वेंधळे कसे रुसावे आयुष्यावर तू स्मरल्यानंतर. ---अभय बापट