Skip to main content

सहिष्णू आणी असहिष्णू

एका दिवसाची शोभा सर्वांना सहिष्णु बनवते किंवा खरं सांगायचे तर जरा जास्तच असहिष्णु बनवते.
शाब्दिक कोलांट्या उड्या मारण्याच्या स्पर्धेत सर्व मेडल्स आपल्यालाच मिळू शकतील याची खात्री मागील काही दिवसात पटली.
आपण जर जेवढे दाखवतो तेवढे सहिष्णु असतो तर क्रिकेटपटूंच्या घरांवर हल्ले झाले नसते,त्यांच्यावर कमरेखालचे वार झाले नसते,त्यांच्या जवळच्या मुलींबद्दल अश्लिल विनोद जन्माला आलेच नसते.
पंतप्रधान मोदी म्हणाले,"दिल जीत के आना" सर्वजण काल पासून फक्त तेवढेच म्हणतायत.
खरंच त्या खेळाडूंपैकी कितीजण भारतीयांचे मन जिंकून गेले ऑलिंपिकला खेळायला गेलेत.
हॉकीमध्ये गटबाजीनी कळस गाठलाय,टेनिसमध्ये हेवेदावे आणी जळावू वृत्ती आमचे भारतीयत्व ठळकपणे नजरेसमोर आणतेय.कुस्तीमध्ये आपल्या स्पर्धकाला नामोहरम करण्यासाठी,आयुष्यातून उठवण्यासाठी गुन्हेगारीकृत्य केले जातेय.
खेळांना राजकारणी लोकांपासून दूर करण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
अच्छे दिन येण्यासाठी खेळ,राजकारण,सहकार या क्षेत्राला लागलेली राजकारण्यांची किड नष्ट केली पाहिजे.
एखाद्या दिवशी शोबाजी करत टोचली गेलेली लस आपल्याला संपुर्ण सहिष्णुता नाही देवू शकत.

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४