Skip to main content

सहजखुण-शांताबाई

रसग्रहण,मला कधीही न जमलेला एक साहित्यप्रकार.
कविता हा खरंतर अत्यंत आवडणारा प्रकार,पण मला साध्या, सरळ, सोप्या भाषेत लिहीलेल्या कवीताच जास्त भावतात.
क्लिष्ट शब्दांची कलात्मक मांडणी मला कधीच आवडत नाही,कदाचित लोकांनासुद्धा म्हणूनतर आवडत्या कविता सांगा असे म्हटले कि पटकन बहीणाबाई,शांता शेळके,मंगेश पाडगांवकर,कुसुमाग्रज,बोरकर यांच्याच कविता आपोआप तोंडातून बाहेर पडतात.
ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेचे रसग्रहण असावे का,कदाचित मराठी साहित्यातील ते पहिले रसग्रहणही असू शकेल.
कवीला शब्दसृष्टीचा ईश्वर म्हटले जाते त्यांने निर्माण केलेले एक-एक काव्य मला त्या अनोख्या निसर्गातील झाडावर लगडलेले फळच वाटते,स्वत:च्या हाताने वेचून काढावे,मनमुराद रस चाखावा,त्या काव्यातील शब्दांच्या खेळाचा गोडवा तोंडात घोळवत ठेवावा.
रसग्रहण हे मला कोणीतरी तयार करून दिलेला रस वाटतो.ग्रेस यांच्या एकेका कवितेचे किती विभिन्न अर्थ काढले जातात हे पाहिले की मलातरी एकच वाटते कविता आधी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा मगच त्या कवीतेचे रसग्रहव वाचावे.
शांता शेळके यांच्या सहजखूण कवितेतील ही कडवी,रसग्रहण या विषयावर नाही पण मला रसग्रहण म्हटल्यावर पटकन तीच आठवते.
सहजखुण
सहज फुलू द्यावे फुल सहज दरवळावा वास,
अधिक काही मिळवण्याचा करू नये अट्टाहास.
सुवास , पाकळ्या, पराग , देठ - फुल इतकीच देते ग्वाही,
अलग अलग करू जाता हाती काहीच उरत नाही.
थेंबामध्ये समुद्राची जर पटते सहजखुण
सुंदराचा धागा धागा कशासाठी घ्यावा उकलून ?
मुखवटाही असेल, असो . . . मागले काहीच नये दिसू
साधे शब्द पुरेत तेच , एक साधे सोपे हसू . . .

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४