Skip to main content

मनूला पत्र

मने, लहानपण किती मजेदार असते नाही,दिसणा-या प्रत्येक गोष्टीतून फक्त आनंदच पाझरता आपल्याला दिसतो.
                        स्वत: लिहीलेल्या पत्रांच्या होड्याकरून त्या होड्यांच्या मैत्रीणींबरोबर स्पर्धा लावणे आणी माझं पत्र आधी पोचले म्हणून टाळ्यावाजवून मैत्रीणीला खिजवणे हाही एक आनंदच.
                        पतंगाला वाऱ्यावर डोलताना बघून वाऱ्यासोबत धावणे हाही एक आनंदच.
                        तूला माहितीय का मने, वाऱ्यावर सळसळणारी पाने एक आगळेवेगळे संगीत निर्माण करत असतात किंवा वाऱ्यावर डोलणारी सुंदर फुले समुहनृत्याविष्कार दाखवत असतात पण ते नृत्य ते संगीत परावलंबी असते.
                        जो पर्यंत वारा वाहतो तो पर्यंतच हा निसर्गाच्या रंगमंचावरचा खेळ चालू असतो.
                        हा खेळ चालण्यासाठी त्या झाडांचे,त्या फुलांचे भक्कमपणे पाय रोवून उभे राहणे हेच सर्वात महत्वाचे,जो पर्यंत ते झाड भक्कमपणे मुळं रोवून उभं आहे तो पर्यंत त्या पानांचे सळसळणे आणी फुलांचे टवटवीत रंग,मुळाचा आधार गेला की सगळं संपलेच, मने.
                        माणसांच पण असच असते मने, आपल्या पायावर उभं राहून आपल्या कामातून आपण आनंद निर्माण करु तोच शाश्वत, दुसऱ्याच्या  वागण्यातून आपण आनंद मिळवू म्हणून आपण वाट पहात बसलो न तर नशीबी फक्त दु:खच येते.
                        मने,आपण लहान मुलांना सांगत असतो मोठ्ठ व्हा पण आपण मात्र लहानच राहतो, दुसऱ्यांच्या वागण्यावरून आपला आनंद आणि दुःख ठरवणारे.
                       

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४