Skip to main content

दिवाळी फराळ

चिवडा हा खरा आदर्श मित्र, सर्वांना बरोबर घेवून जाणार,लहानथोर हा भेदभाव याच्या जवळ अजिबात नाही. त्याला सोबतील काजू चालतात तेवढ्याच आत्मियतेने तो शेंगदाणे,खोबरं,डाळं याच्यातही रमून जातो.तिखट मिरची,कडू हिंग,गोड साखर,आंबट सायट्रिक अॅसिड,आमचूर पावडर,तुरट कढिपत्ता कोणाशीही त्याचा उभा दावा नाही सर्वसमावेशक आदर्श सहकारीमहर्षी.
      चकली आणि अनरस हीे दोन मुलं जरा वेंधळीच असतात,काळ वेळ न बघता अजागळासारखी हसतच सुटतात, किती आंजारावं - गोंजाराव लागतं त्यांना.
       लाडू लहानमुलांसारखे एकतर टणटण करीत बसतात नाही तर चिखलात बसलेल्या म्हशी सारखे ढिम्म बसूनच राहतात.
      शंकरपाळी बिचारी सर्वात समंजस,एकटे एकटे पोटाच्या गुहेत बिनदिक्कत घुसतात नाहीतर चहाची साथसंगतही हसतमुखाने सहन करतात.
       करंजी बिचारी काटकसर या नावाखाली खुळखुळा बनूनच हातात पडते,बिचारी एकेकाळी घरोघरी कंपलसरी असणारी ही मुलगी आता नावडती मुलगी होवून बसलीय.
      शेव एकटी येते स्वतंत्रबाण्याने राहते आणि अनेकांना आधार देत खवय्यांना खुष करत असते.
       प्रत्येकाची चव वेगळी,रंग, आकार,गंधही वेगळा,जेवढ्या गृहिणी तेवढी अनोखी यांची जातकुळी पण आता दुकानातून यायला लागले घरोघरी आणि व्हॉट्सअप मेसेजेस सारखी निव्वळ फॉर्वर्ड्सची सुरवात झाली.

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४