Skip to main content

Posts

Showing posts from February, 2020
मुक्यांचे नेहमीच फक्त शोषण होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही मुकी जास्वंद, ना हिला देवच्या पायांवरती जागा,ना सुशोभित उद्यानांनमध्ये, हिचा उपयोग फक्त लहान मुलांकडून मध शोषून घेण्यासाठीच.          जी गोष्ट साध्या कुत्र्याला उमजली सर्वांना समजतेच असे नाही, कुत्राही विनाकारण भुंकत राहतो कारण त्यालाही माहीत असतं आपण शांत राहीलो तर मालक अन्न घालायच विसरेल.          ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा लक्षात आली ती पाश्र्चात्य संत आदरणीय व्हॅलेंटाईन यांच्या, त्यांनी मुक्यांसाठी एक दिवसच ठरवून दिला, या दिवशी कोणीही मुक्यांनी आपल्या भावना आपल्या प्रिय व्यक्ती समोर व्यक्त करु शकतो.           रा.रा. मार्कआण्णा झुकेनबर्ग यांच्या सहर्ष योगदानामुळे या मुक्यांची ही गाथा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचली.           मुक्यांचे हे महत्व लक्षात," शंभर करोड इंडीयन व्हॉट्सअप गुळपाडू ग्रुप" तर्फे एक ठरावा बिनविरोध पास  करण्यात आला, फेसबुकला जगभर फेसबुक म्हटले तरी सर्वाधिक युझर असलेल्या भारतात त्याचे नाव.................

विफलता

परवा एक ब्लॉग वाचताना एक सुंदर वाक्य वाचायला मिळाले," विफलतेतून द्वेषाचा जन्म होतो"        आपले अपयश हे पचवायला शिकले पाहिजे,अपयश हे जर मनाला विफलतेच्या खोल गर्तेत ढकलत असेल तर वेळीच सावध होण्याची गरज.        प्रत्येक वेळी यश मिळालेच पाहिजे हा अट्टाहास सोडून दिला पाहिजे.तुमचे यश हे दुसऱ्या कोणाचे अपयश असू शकते किंवा याच्या उलट तुमचे अपयश दुसऱ्या कोणाचे यश ही.        प्रत्येक वेळी अपयशी व्यक्ती द्वेषाच्या मार्गावर धावू लागला तर हा समाज कोलमडून पडेल.

चुंबन

माझ्या वाचनातील पहिली चुंबन कविता "राम गणेश गडकरी" यांनी १९१२ साली लिहीली," पहिले चुंबन"  त्या कवितेचा शेवट करताना ते लिहीतात,                  "निशिदिनी। वाटते मनीनित्य जन्मुनी| मरण सोसावे ।          परि पहिले चुंबन घ्यावें । फिरुनिही॥6॥      त्यानंतर शेकडो कवींनी हा विषय चाखला.       एका अज्ञात कवीने ना.धों. महानोर यांचे शब्द उसने घेवून लिहीले आहे,             " या कवीने               त्या कवीचे              शब्द घ्यावे              आणि कवितेच्या वाऱ्यावरी              स्वार व्हावे              सुटेल मांड तुझी कधी चुकीने              पण कवी म्हणून गावात मिरवावे.              कोणती पुण्ये अशी     ...

मिठी

आतल्या गाठीची माणसं जेव्हा मिठीमध्ये शिरतात, हळव्या रेशमी नात्यांनाही निरगाठी बनवून टाकतात.

मिठी....

मिठी........ शब्दांनी हळूवार पणे दिलेले आलिंगन किंवा शब्दांची जिवघेणी मगरमिठीच जास्त दिवस लक्षात राहते                   आयुष्यातील पहिली मिठी म्हणजे आई- बाबांनी हळूवारपण पहिल्यांदा जवळ घेणे आणि बालपणीच्या असंख्य वेळा जवळ घेतलेले आपण सहज विसरुन जातो.                   नंतर काळा प्रमाणे मिठीची मागणी आणि आवेग बदलत जातो.                   मित्रमंडळींची आश्वासक मिठी, प्रेयसीची अल्लड  मिठी, पत्नीची उबदार मिठी,मुलांची उभारी देणारी मिठी,नातवंडांची कोवळी लुसलुशीत मिठी.                   तरीही आयुष्यभर लक्षात राहते ती शब्दांनी मनावरती घेतलेली पकड. ती मन,मत आणि आयुष्य बदलण्याइतकी सामर्थ्यवान असते.

प्रेम-गांभुळलेली चिंच

पहिल्या नजरेत तोंडाला पाणी सुटते. तिला मिळवल्याशिवाय चैन पडत नाही. एकदा ती मिळाली की मांजर जसे डोळे मिटून दूध पिते तसे हळून सगळ्यांच्या नकळत....... फक्त खास माणसांनजवळ आपली हे गुपीत शेअर केले जाते. शेवटपर्यंत साथ दिली तर अपुर्व समृद्ध आनंद मिळणार हे नक्की. प्रेमाबद्दल नाही गाभूळलेल्या चिंचेबद्दल आहे हे, प्रेम हे असतच गाभूळलेल्या चिंचेसारखे, आंबट,गोड,तुरट, फक्त योग्य वेळ येईपर्यंत धीर धरला पाहीजे.