परवा एक ब्लॉग वाचताना एक सुंदर वाक्य वाचायला मिळाले," विफलतेतून द्वेषाचा जन्म होतो"
आपले अपयश हे पचवायला शिकले पाहिजे,अपयश हे जर मनाला विफलतेच्या खोल गर्तेत ढकलत असेल तर वेळीच सावध होण्याची गरज.
प्रत्येक वेळी यश मिळालेच पाहिजे हा अट्टाहास सोडून दिला पाहिजे.तुमचे यश हे दुसऱ्या कोणाचे अपयश असू शकते किंवा याच्या उलट तुमचे अपयश दुसऱ्या कोणाचे यश ही.
प्रत्येक वेळी अपयशी व्यक्ती द्वेषाच्या मार्गावर धावू लागला तर हा समाज कोलमडून पडेल.
Comments
Post a Comment