Skip to main content

चुंबन

माझ्या वाचनातील पहिली चुंबन कविता "राम गणेश गडकरी" यांनी १९१२ साली लिहीली," पहिले चुंबन"  त्या कवितेचा शेवट करताना ते लिहीतात,
        
        "निशिदिनी। वाटते मनीनित्य जन्मुनी| मरण सोसावे ।
         परि पहिले चुंबन घ्यावें । फिरुनिही॥6॥

     त्यानंतर शेकडो कवींनी हा विषय चाखला.
      एका अज्ञात कवीने ना.धों. महानोर यांचे शब्द उसने घेवून लिहीले आहे,

            " या कवीने 
             त्या कवीचे
             शब्द घ्यावे
             आणि कवितेच्या वाऱ्यावरी
             स्वार व्हावे
             सुटेल मांड तुझी कधी चुकीने
             पण कवी म्हणून गावात मिरवावे.

             कोणती पुण्ये अशी
             आली फळाला
             मराठी
             मातीतच
             जन्मा यावे"
             
            
एका अमेरीकन स्टॅडअप शो करणाऱ्या पत्रकाराने ख्रिश्चन धर्मगुरु पोप यांना ठणकावून सांगितले होते," जो खेळ आपण कधीही खेळलो नाही,त्याच्या नियमाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही".

तो धागा धरुन आपल्या एका क्रिकेटपटूंने हर्ष भोगले यांना सांगतले," ज्यांनी कधी बॅट हातात धरली नाही त्यांनी खेळाडूला कसे खेळावे हे शिकवू नये."

पण आपल्या जाणत्यांनी लिहून ठेवलेय,

       "देवाला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही
       म्हणून त्याने आईला जन्माला घातला."
       
       "या छोट्याशा आयुष्यात प्रत्येक ज्ञान स्वत:
       आत्मसात करता येत नाही म्हणून गुरुंना जन्माला घातले"

        प्रत्येक गोष्ट अनुभवता येत नाही म्हणून देवाने
        लेखक/कवींना जन्माला घातले.

म्हणून मी पण खेळाचे सर्व नियम धाब्यावर बसवून
गुरुवर्य गडकरी आणि महानोर यांची माफी मागून त्यांचेच शब्द उसने घेवून आजच्या महायज्ञात माझीही एक समिधा अर्पण करतो.

             या ओठांनी
             त्या ओठांना
             दान द्यावे
             आणि गात्रागात्रांतून
             चैतन्य फुलावे.

              कोणती पुण्ये अशी
              येती फळाला
              रुक्ष ओठांत
              तीच्या
              डाळींब भरावे.

         

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४