Skip to main content

Posts

Showing posts from March, 2020

स्पिरीट म्हणजे काय रे भाऊ ?

स्पिरीट म्हणजे काय रे भाऊ ?          खुप गर्दीमुळे कोरोना रोग पसरतो हे माहीती असून अनावश्यक गर्दी करणे म्हणजे स्पिरीट की खेडेगावात एक किमी.अंतरात ५-६ माणसंच भेटतात माहीती असून मुखलंगोट लावून फिरणे म्हणजे स्पिरीट.          जन्माला आलेला प्रत्येकजण कधीतरी मरणारच आहे त्यात काय घाबरायचे म्हणणे म्हणजे स्पिरिट कि आपल्याच इथल्या परदेशात खेळायला गेलेल्या खेळाडूंसमोर अन्नाची ताटली लांबून लोटून देणे म्हणजे स्पिरीट.          जे भक्तीमार्गात आहेत तेच वाचतील असे म्हणणे म्हणजे स्पिरिट कि निसर्गाने/ईश्वराने संतुलन साधण्यासाठी योजलेला उपाय आहे हा असे म्हणणे स्पिरीट.           हे जंतूंशी मानवांचे युद्ध आहे आणि ते विज्ञानाच्या सहाय्याने लढू म्हणणे स्पिरिट कि तापमान वाढले की व्हायरस नष्ट होईल या विश्वासावर हातावर हात धरुन स्वस्थ बसणे म्हणजे स्पिरीट.            मलाच सर्व समजतं मी मला हवे ते करीन असे उद्दामपणे म्हणणे स्पिरीट कि कोणीली दिलेली चांगले सल्ले मी अंमलात आणीन म्हणणे स...

काळाबाजार-- भावनांचा

काळाबाजार काही फक्त जीवनावश्यक वस्तूंचाच होत नाही........       एखादी व्यक्ती करुणाबुद्धीने,सेवा म्हणून एखादे काम करत असेल तर त्या कामावरचे माणुसकीचे लेबल काढून तिथे जातीचे लेबल चिकटवणे म्हणजे भावनांचा काळाबाजारच.

मनमोकळ्या गप्पा-मनाच्या मनाशी

मने,      आठवतय तुला दोन वर्षांपूर्वी तू मला अनफ्रेंड केलेस तेव्हा मी विचारले होते,"एवढी काय गरज होती अनफ्रेंड करण्याची ?      तेव्ही तू नेहमी सारखेच खुप मोठे लेक्चर ऐकवले होतेस,डिस्कनेक्ट होणे काय, मन:स्वास्थ काय किती अवघड शब्दात सांगायचा प्रयत्न केला होतास. मला अजिबात समजले नव्हते कारण मला ते समजून घ्यायचेच नव्हते,जी गोष्ट मनालाच पटली नाही ती का समजून घ्यायची.      पण सर्व अवघड गोष्टी सोप्या भाषेत समजावून देणाऱ्या, गुरुंचाही गुरु असलेल्या निसर्गाने गेल्या दोन वर्षात हे सुद्धा समजावून दिले.            मने, आपण प्रेमाने बागेत लावलेली,गुलबक्षी, सदाफुली, लाजाळू जेव्हा बागेतल्या बाकीच्या झाडांना गराडा घालून नष्ट करु पाहतात तेव्हा त्यांच्यावर कात्री चालवावीच लागते.            मने,सावरता येत नसेल तर आवर घालावा लागतोच हेच तेव्हा तू सांगत होतील.      पण तरीही मने डिस्कनेक्ट होणे आणि तोडून टाकणे यात जमीन आस्मानाचा फरक आहे हे नाही का समजले तुला.         ...

धुलिवंदन- आपली संस्कृती

धुळवड अर्थात धुलिवंदन बहिणाबाई चौधरींच्या एका कवितेच्या ओळी आहेत--- मन जहरी जहरी, त्याचं न्यारं रे तंतर। अरे इंचू, साप बरा, त्याले उतारे मंतर।। विंचू, साप यांचे विष मंत्र,औषधोपचार याने उतरता येते पण मनातील राग,द्वेषबुद्धी यावर कोणताही उपाय चालत नाही. भारतीय संस्कृतीवर कायम एक आरोप केला जातो तो म्हणजे ही संस्कृती भावनांचे दमन करायला लावते पण होळी आणि धुळीवंदन हे याला चोख उत्तर आहे. होळीच्या दिवशी मनातील राग-द्वेष, किल्मिष होळी पेटवताना व्यक्त करुन त्यांना जाळून,नष्ट करुन मोकळे व्हायचे, आधुनिक मानसशास्त्र हे पण हेच सांगते," भावना मनात दाबून टाकून कुढत राहण्यापेक्षा, त्या व्यक्त करुन त्यांचे ओझे मनावरुन उतरवून टाकणे हा मनाच्या स्वास्थासाठी चांगले असते" हि संधी होळीच्या रुपाने आपली संस्कृती आपल्याला देते. होळीच्या वेळेला निरुपयोगी पालापाचोळा,लाकूड फाटा, त्याच बरोबर मनातील अडगळही जाळून टाकायची. दुसऱ्या धुळीवंदनाच्या दिवशी ती राख अंगाला फासून त्या सगळ्या अडगळींपासून निवृत्त व्हायचे, अनेक प्रकारच्या झाडांची ही राख औषधी असते,त्वचारोगांवर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. त्याच होळीच्...

जागतिक महिला दिन

दंडवते आज्जी :- भयंकरणी तू मला विसरलीस फॉरीनला गेल्यावर पण तुझा छोटा दादा नाही विसरला बरं का, आजही तुझा नाही पण त्याचा मेसेज आला हो शुभेच्छा द्यायला. अ भयंकर काकू :- काय उपयोग त्या फॉरवर्डेड मेसेजचा,मनापासून लिहीलेले दोन शब्द जास्त आनंद देतात त्या पेक्षा. हे फॉरवर्डेड मेसेज पाठवून नाती जपणं म्हणजे दुसर्याच्या जागेत कृत्रिम झाडं लावून ऋतू बदलण्याची वाट बघण्यासारखंच. दंडवते आज्जी :- अगो, सगळ्यांनाच नाही जमत मनातले विचार शब्दात मांडायला. ऋतू वरुन आठवले, मराठीमध्ये कितीतरी मोठमोठे लेखक होवून गेले. दुर्गा भागवत,शरदिनी डहाळूकर आणि आणखी दोनचारजणं सोडता कितीजणांनी सृष्टीला भरभरुन देणाऱ्या ऋतूंना शब्दबद्ध केले आपल्या लेखणीतून. अ भयंकर काकू :- हे काय मधेच ऋतूंचे आणलेत तुम्ही कुंचकानीकुंचका. दंडवते आज्जी :- स्त्री ही ऋतूं सारखीच असते.निसर्गातले ऋतू बदलतात आणि निसर्गांचा रंग बदलून जातो, प्रत्येक बदलत्या ऋतूबरोबर निसर्गसृष्टी समृद्ध होत जातो. माणसांच्या आयुष्यात वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात स्त्रीही वेगवेगळे ऋतूरंग घेवून, वेगवेगळ्या रुपात येते,भरभरुन देते, आयुष्य समृद्ध करते आणि तरीही नेहमीच्या सवय...