Skip to main content

जागतिक महिला दिन

दंडवते आज्जी :- भयंकरणी तू मला विसरलीस फॉरीनला गेल्यावर पण तुझा छोटा दादा नाही विसरला बरं का, आजही तुझा नाही पण त्याचा मेसेज आला हो शुभेच्छा द्यायला.

अ भयंकर काकू :- काय उपयोग त्या फॉरवर्डेड मेसेजचा,मनापासून लिहीलेले दोन शब्द जास्त आनंद देतात त्या पेक्षा. हे फॉरवर्डेड मेसेज पाठवून नाती जपणं म्हणजे दुसर्याच्या जागेत कृत्रिम झाडं लावून ऋतू बदलण्याची वाट बघण्यासारखंच.

दंडवते आज्जी :- अगो, सगळ्यांनाच नाही जमत मनातले विचार शब्दात मांडायला. ऋतू वरुन आठवले, मराठीमध्ये कितीतरी मोठमोठे लेखक होवून गेले. दुर्गा भागवत,शरदिनी डहाळूकर आणि आणखी दोनचारजणं सोडता कितीजणांनी सृष्टीला भरभरुन देणाऱ्या ऋतूंना शब्दबद्ध केले आपल्या लेखणीतून.

अ भयंकर काकू :- हे काय मधेच ऋतूंचे आणलेत तुम्ही कुंचकानीकुंचका.

दंडवते आज्जी :- स्त्री ही ऋतूं सारखीच असते.निसर्गातले ऋतू बदलतात आणि निसर्गांचा रंग बदलून जातो, प्रत्येक बदलत्या ऋतूबरोबर निसर्गसृष्टी समृद्ध होत जातो.
माणसांच्या आयुष्यात वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात स्त्रीही वेगवेगळे ऋतूरंग घेवून, वेगवेगळ्या रुपात येते,भरभरुन देते, आयुष्य समृद्ध करते आणि तरीही नेहमीच्या सवयीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष व्हावे त्याप्रमाणे त्यांचे अस्तित्व दुर्लक्षितच राहते, मग असा एक दिवस शोधून साजरा करावा लागतो.

अ भयंकर काकू :- तुम्ही पण लेखिका झालात की आजी

दंडवते आज्जी :- हे मी पण फॉरवर्डssच करतेय हो बोलून, तुझ्या त्या चहाटळ नातवाने मला पाठवले ते मी इथे बोलतेय,तुझ्याच भाषेत बोलायचे तर, त्याने तुझ्यासाठी लावलेली ही कुंडी तुझ्या दारात ठेवून मी आपल्या नात्याचा ऋतू बदलण्याची वाट बघतेय.

माझ्याकडून आणि तुझ्या नातवाकडून तुला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४