Skip to main content

अधांतरी.....

निरर्थकाची डायरी

अधांतरी....
           काल आदित्यची बातमी ऐकली, तात्या अभ्यंकरांनी कधीकाळी आम्हाला एका ग्रुपवर ॲड केलं तेव्हापासूनची ओळख. त्याची वक्तृत्व स्पर्धेतील बक्षीसं, त्याची जर्लनालिस्ट होण्याची आणि त्यासाठी डिप्लोमा करण्याची धडपड. चिपळूणमध्ये सुरु केलेलं हॉटेल. उभं रहाण्यासाठी सुरु असलेली झुंज. काल नियतीने करार मोडला आणि ही झुंज एकाएकी एकांगी संपली.
           काल समजलं आणि मन सुन्न झालं. पुनर्जन्म असेल तर तो अपुरी स्वप्न डोळ्यात घेवून पुन्हा येईलच. पण काल पहिला विचार आला तो त्याच्या होणाऱ्या बायकोचा,तीची गेली कित्येक महिने बघितलेली स्वप्न डोळ्यातच गोठली,त्या स्वप्नांचा आधारच खचून गेला.
           असंच असतं आपण बघितलेली स्वप्न ही आपली स्वत:ची असली तरी आजूबाजूच्या लोकांच्या भक्कम आधारावरती अवलंबून असतात. मैत्री, प्रेम, जीवन, स्वप्न, स्वातंत्र्य भक्कम आधारावर असेल तरच अर्थपुर्ण.
           एकाकी अधांतरी लटकणाऱ्या गोष्टी कितीही सत्य,शिव आणि सुंदर असल्यातरी निरर्थकच, परिस्थितीच्या फटकाऱ्यांनी हेलकावे खाणाऱ्या,अगदी नक्षत्रांची छत्री म्हणून गौरवल्या गेलेल्या या तगरीच्या फुलासारख्या.

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४