Skip to main content

Posts

Showing posts from September, 2021
जूने दु:ख उगाळणे बरे नव्हे तेच ते रडगाणे गाणे बरे नव्हे, किती रंग आहेत जीवनात या नव्यात जूने रंग मिसळणे बरे नव्हे

सहजच.....

सहजच लिहीली कविता सहजच शब्द आले ओठी सहजच कवितेतून उमटले मन भावनेचे मोती. सहजच भरावे आभाळ सहजच व्हावी कातरवेळ सहजच ओठामधून उमलावी शुभ्र बगळ्यांची माळ. सहजच यावी तान सहजच उठावी लकेर सहजच अंतरंगात जमावी आप्त स्वकीयांची मैफल. सहजच फुल उमलावे सहजच बाळ हसावे सहजच दारी यावे सुख समाधानाचे पाऊल. सहजच सुख वेचावे सहजच समाधान वाटावे सहजच येता जाता द्यावे थोडे आनंदाचे देणे.
विशाखा अभ्यंकर आज्जी काही माणसं असतात कोमल,नाजूक, सुगंधी, सुंदर, सर्वांना हवीहवीशी वाटणारी - प्राजक्ता सारखी. प्राजक्ताला देववृक्ष म्हणतात तशीच.   देव बघितलेला नसला तरी काही माणसं देवाचे गुण घेवून येतात. त्यांना जपावे लागते हळूवारपणे, न दुखावता आपल्या ओंजळीत, आठवणींच्या कप्प्यात   असाच एक देवतरु माझ्या बागेतही आहे. लांब राहूनही लयलूट करणारे आनंदाची,आशिर्वादाची.  सहवासातील प्रत्येकावर माणिकमोत्यांचा लयलूट करणारी, फक्त त्यांच्या सावलीशी एकरुप होता आले पाहीजे.

सहजच

सहजच लिहीली कविता सहजच शब्द आले ओठी सहजच कवितेतून उमटले मन भावनेचे मोती. सहजच भरावे आभाळ सहजच व्हावी कातरवेळ सहजच ओठामधून उमलावी शुभ्र बगळ्यांची माळ. सहजच यावी तान सहजच उठावी लकेर सहजच अंतरंगात जमावी आप्तांची स्वकीयांची मैफल. सहजच फुल उमलावे सहजच बाळ हसावे सहजच दारी यावे सुख समाधानाचे पाऊल. सहजच सुख वेचावे सहजच समाधान वाटावे सहजच येता जाता द्यावे थोडे आनंदाचे देणे.

प्रेमावरची पुस्तके

"प्रेम हे वाचण्याची गोष्ट नाही तर करण्याची गोष्ट आहे" असे व.पु.काळे किंवा अवि.बापट दोघांपैकी एकाने म्हटले आहे.  आणि मुख्य म्हणजे दोघांनी केले नाही म्हटलेच आहे.

पहाटेची जाग

गजर लावतो,जाग येते पण तेव्हा बाहेरचा उजेड अजून पहाट झाली नाही असे ओरडून सांगत असतो,मन द्विधा होते शेवटी घड्याळापेक्षा हजारो वर्षांचा अनुभव गाठीशी असलेल्या सुर्यावर डोळे झाकून विश्वास टाकतो आणि डोक्यावरुन परत पांघरूण ओढून घेतो.

आठवणी - २

आज गौरी गणपती घरी जाण्यासाठी निघतील,त्यापूर्वी सगळ्यांनासाठी प्रसाद घेवून आलोय. सुकामेवा आहे म्हणजे कोणालाही व्यर्ज असण्याचे कारण नाही.        कडू किंवा खवट निघणार नाही याची १००% गॅरेंटी कारण "पुराना है यह !" पन्नास वर्षांपेक्षा जास्त.        गावातल्या मारुती मंदिरात दासनवमी उत्सवाच्यासाठी अनेक वर्ष नाशिकचे काळेबुवा किर्तनासाठी येत त्यांच्याकडून आजोबांनी हा सुकामेवा घेतला होता. आता आजोबाही नाहीत,काळेबुवा ही नाहीत पण ही आठवण, हि मातीची कला अजूनही जशीच्या तशी शिल्लक राहीली आहे.

आठवणी - १

"आठवणी या कठीण कवचाच्या फळांसारख्या असतात, उमेदीच्या काळात त्यांचा मधूर स्वाद घेता येतो,नंतर मात्र कातर खिन्नपणाच चाखायला मिळतो".                                 ----कॉपीकॅट काळे.            या तर आजोबांच्या आठवणी पन्नास वर्षांपूर्वीच्या काळातल्या,ज्या काळात फळांचा सुकाळ एवढा मोठ्या प्रमाणात झाला नव्हता, विज्ञानही फळांना ऋतूंच्या बंदिस्त पिंजऱ्यातून मुक्त करण्याएवढे पुढारलेले नव्हते. आणि हवी त्याच दिवशी फळांंना पिकायला लावणारी केमिकल्स जन्माला यायची होती.           त्या पुरातन काळी बाप्पाच्या साध्या डेकोरेशनसाठी ही फळं समोर मांडण्याची बाळबोध रीत होती.

गजानन

निसर्ग बरसला सुखाचा पाऊस, आनंदाचा कंद घरी आला. भक्तीचा उत्सव आनंदले रोम गणपतीचा सण आला आला. सुखकर्ता आला विघ्नहर्ता आला, आयुष्याचा कर्ता घरी आला. वर्षभर ज्याची पाहतो मी वाट, तो दु:खहर्ता घरी आला. फुलला पारिजात उंचबळे सुवास, सुगंधाचा दाता घरी आला. विद्येचा ईश्वर ज्ञानाचा दाता बुद्धीचा विधाता घरी आला.