Skip to main content

Posts

Showing posts from August, 2022

राधा भेटली नाही

भेटली अनंत नाती, माणूस भेटला नाही कृष्ण भेटला पावलोपावली,राधा भेटली नाही. सुख भेटले अनंतहस्ते,समाधान भेटले नाही विद्या भेटली गुरुमुखातून, ज्ञान भेटले नाही. सखे भेटले वळणावरती,साथ भेटली नाही शब्द मिळाले अविरत इथे , प्रेम भेटले नाही. जिथे तिथे चर्चा गोविंदांची,गोपाळ भेटला नाही आरक्षणा धावतील सारे,रक्षक भेटला नाही. भोगी भेटले आयुष्यामध्ये,योगी भेटला नाही सत्ता भेटली इथे मुरारी,सावली भेटली नाही. विश्वासाने चालत होतो,ध्येय भेटले नाही सर्व मिळाले तुझे कान्हा,राधा भेटली नाही. १९/०८/२०२२

स्वातंत्र्य - असलेले नसलेले

घाबरुन रहावे लागते.......           भिती ही नैसर्गिक प्रवृत्ती असली तर माणूस अनुभवातून काही गोष्टीपासून दूर रहायला शिकतो, ही भिती शारीरिक, मानसिक, सामाजिक आरोग्यासाठी आवश्यक असते.         एखाद्या वस्तीतून,गावातून वाहन चालवताना चालकाला जास्तच जागरुक रहावे लागते कारण त्यांना माहीत झालेले असते की या भागात कणभर अपघात घडला तर तुमची चुक नसली तरी मार तुम्हालाच खावा लागणार.           रिक्षा किंवा टमटम सारखी वाहन कशीही चालवली जातील,तुमची गाडी पुढे आडवी उभी करतील पण त्यांचा धक्का जरी तुम्हाला लागला तरी मार आणि शिव्या तुम्हालाच खाव्या लागतील.           मधमाश्यांच्या पोवळ्याशी छेडछाड न करताही आजूबाजूला वावणाऱ्यांवरसुद्धा त्या झुंडीने हल्ला चढवतात, तशीच माणसांची झुंड तुमच्यावर धावून येते.           माणसांचे संघटन कोणला त्रास देण्यासाठी नसते तो पर्यंतच ते चांगले असते पण एकदा का संघटनेतील विध्वंसक शक्ती समोर आली की....           घाबरुन रहावेच लागते.   ...

आठवण

जपला खिशात मी तुझा रुमाल होता गुलाबी पाकळ्यांचा देही गुलाल होता. आठवणीच्या खजिना उरात साठलेला स्वप्नांच्या वाटेवरचा तो हमाल होता. बांधलेला तुझ्यासाठी शब्दांचा महाल होता शब्दांनीच उभा केला पुढती सवाल होता. चढला होता रंग तुझ्या ही गालावरती की तुझा अभिनय तेव्हा कमाल होता. ----- अभय बापट १३/०८/२०२२
पाखरांनी घेतली भरारी फार झाली. माणसांनी घेतली उधारी फार झाली. उसनी आहे उंची आकाश पाळण्याची माणसांची स्वप्ने विषारी फार झाली. पुर्वा पार जपले गेले माणसाचे माणूसपण पुर्वीच्या काळात माणसे विचारी फार झाली.  शब्दा़ंचा अर्थच हरवला आहे आज काल माणसांची मने विखारी फार झाली. श्वापदांचे घर मनातच असते सदाचे माणसांची वस्ती अत्याचारी फार झाली नको गोंदवूस भाळावरती नाव कुणाचे गर्दीतील माणसे अविचारी फार झाली. सावधपणे एक आता देवाघरच्या हाका नवीन अवतार होण्याची तयारी फार झाली. -------- अभय बापट ०९/०८/२०२२