Skip to main content

स्वातंत्र्य - असलेले नसलेले

घाबरुन रहावे लागते.......
          भिती ही नैसर्गिक प्रवृत्ती असली तर माणूस अनुभवातून काही गोष्टीपासून दूर रहायला शिकतो, ही भिती शारीरिक, मानसिक, सामाजिक आरोग्यासाठी आवश्यक असते.
        एखाद्या वस्तीतून,गावातून वाहन चालवताना चालकाला जास्तच जागरुक रहावे लागते कारण त्यांना माहीत झालेले असते की या भागात कणभर अपघात घडला तर तुमची चुक नसली तरी मार तुम्हालाच खावा लागणार.
          रिक्षा किंवा टमटम सारखी वाहन कशीही चालवली जातील,तुमची गाडी पुढे आडवी उभी करतील पण त्यांचा धक्का जरी तुम्हाला लागला तरी मार आणि शिव्या तुम्हालाच खाव्या लागतील.
          मधमाश्यांच्या पोवळ्याशी छेडछाड न करताही आजूबाजूला वावणाऱ्यांवरसुद्धा त्या झुंडीने हल्ला चढवतात, तशीच माणसांची झुंड तुमच्यावर धावून येते.
          माणसांचे संघटन कोणला त्रास देण्यासाठी नसते तो पर्यंतच ते चांगले असते पण एकदा का संघटनेतील विध्वंसक शक्ती समोर आली की....
          घाबरुन रहावेच लागते.
          स्वातंत्र्याच्या भोवतीसुद्धा भितीचे काटेरी कुंपण असते, त्याच्या आतच स्वातंत्र्याचा आनंद घेता येतो कारण तिथे स्वातंत्र्यापेक्षा संघटना आणि त्यांचे एकगठ्ठा मतदान तुम्हाला भिती घालत असते.
          अनेक शब्द ओठांआड
          कधीचे येवून अडलेले,
          आणि माझ्या स्वातंत्र्याला
          मोठेच कोडे पडलेले.
          

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४