घाबरुन रहावे लागते.......
भिती ही नैसर्गिक प्रवृत्ती असली तर माणूस अनुभवातून काही गोष्टीपासून दूर रहायला शिकतो, ही भिती शारीरिक, मानसिक, सामाजिक आरोग्यासाठी आवश्यक असते.
एखाद्या वस्तीतून,गावातून वाहन चालवताना चालकाला जास्तच जागरुक रहावे लागते कारण त्यांना माहीत झालेले असते की या भागात कणभर अपघात घडला तर तुमची चुक नसली तरी मार तुम्हालाच खावा लागणार.
रिक्षा किंवा टमटम सारखी वाहन कशीही चालवली जातील,तुमची गाडी पुढे आडवी उभी करतील पण त्यांचा धक्का जरी तुम्हाला लागला तरी मार आणि शिव्या तुम्हालाच खाव्या लागतील.
मधमाश्यांच्या पोवळ्याशी छेडछाड न करताही आजूबाजूला वावणाऱ्यांवरसुद्धा त्या झुंडीने हल्ला चढवतात, तशीच माणसांची झुंड तुमच्यावर धावून येते.
माणसांचे संघटन कोणला त्रास देण्यासाठी नसते तो पर्यंतच ते चांगले असते पण एकदा का संघटनेतील विध्वंसक शक्ती समोर आली की....
घाबरुन रहावेच लागते.
स्वातंत्र्याच्या भोवतीसुद्धा भितीचे काटेरी कुंपण असते, त्याच्या आतच स्वातंत्र्याचा आनंद घेता येतो कारण तिथे स्वातंत्र्यापेक्षा संघटना आणि त्यांचे एकगठ्ठा मतदान तुम्हाला भिती घालत असते.
अनेक शब्द ओठांआड
कधीचे येवून अडलेले,
आणि माझ्या स्वातंत्र्याला
मोठेच कोडे पडलेले.
Comments
Post a Comment