Skip to main content

Posts

Showing posts from March, 2021

फुल्स डे-एव्हरी डे

जशी देवाची भक्ती आपण बारा महिने करत असलो तरी वर्षातील एक दिवस निवडून आपण त्या भक्तिचा उत्सव साजरा करतो. त्याचप्रमाणे वेडेपणाचा वसा आपण कायमस्वरूपी स्विकारला असला तरी त्याचा उत्सवही एक दिवस साजरा करतो. वेडेपणाचे गंध अविरत उगाळून त्याचा लेप आपल्यावरच करुन आपली निर्मळ वृत्ती आपण झाकून टाकतो.  या वेडेपणाच्या जागतिक उत्सवाला हार्दिक शुभेच्छा, हा उत्सव अनंत काळापर्यंत साजरा करण्याची शक्ती आपल्याला लाभो हीच प्रार्थना.

साथ पानाची

पानाची साथ सुटते झाडापासून. वेदना तर होत असतीलच दोघांनाही. पण झाडं स्थिर राहतं भक्कमपणे पाय रोवून.        पान मात्र भिरभिरते,वाऱ्यावरती, मायेच्या उबेच्या आशेने धरतीकडे धावते.काहींच्या नशीबी असते ही उब, काहींच्या नशीबी मात्र जळून जाणे आठवणींच्या वैशाखवणव्यात.        माणसांनी झाडा सारखं व्हावे, स्थिर,आत्ममग्न,त्याला सृजनाची साथ असते हे खरेच, म्हणूनच ते परिपुर्ण असते,आप्तांच्या संगतीत.         पानं,कळ्या,फुलं,फळं मिरवीत,आनंदाने डोलत.

आप्पा आणि बाप्पा

आप्पा आणि बाप्पा जून्या आठवणीत रमले होते. त्यांनी लिहीलेली, संकलित केलेली जूनी पुस्तकं चाळत उजळणी चालू होती.         बाप्पा एकदम आप्पाला म्हणाले," चल,कुछ तुफानी करते है, कलयुग का नया महाभारत रचते है".          आप्पा म्हणाले बाप्पांना," या वेळी मात्र मी एकटा सलग गोष्ट सांगणार नाही,पृथ्वीवरच्या सामन्य माणसांनाही संधी देवूया,गोष्टी रचायची आणि गोष्टी पुढे ढकलण्याची ही".            त्यावर बाप्पा ही म्हणाला," असे असेल तर लिहीलेलं,वाचलेलं आणि फॉरवर्ड केलेली गोष्ट,तीचा मतितार्थ समजून घेण्याची अट ही कोणावरच नसावी".              योजना ठरली आणि जन्म झाला,कलियुगाच्या महाभारताचा अर्थात व्हॉट्सअपचा.               दोघांचे ठरले सर्वात जास्त मतितार्थ न समजता केले जाणारे, परस्पर विरोधी अर्थ असणारे दोन मेसेज शोधायचे आणि नंतर माणसांना कायमचे यात गुंतवून ठेवायचे. अट फक्त एकच, " मेसेजेचा ओघ थांबता कमा नये, जेव्हा तो थांबेल तेव्हा हे व्हॉट्सअपसुद्धा बंद होईल".  ...

सुख-दु:ख

सुख नव्याने सावरता वेदनेचा शेला हाती, दु:ख भरल्या दिवसाची छोटीशी पहाट होती. तू देतो म्हणूनी मी हात पुढे केला, चांदण्याचा हातातून ही सूर्य हाती आला. जे जे होते माझ्यापाशी ते ते सुटून गेले, सुखाच्या रस्त्यावरती दु:खाचे गाव लागले.

पन्नाशी

  सोळावं वरीस धोक्याचं म्हटले जाते ते मुलीसाठी-स्त्री करीता खरे असेलही पण पुरुषांच्या आयुष्यातील धोक्याची वर्ष ही पन्नाशीच्या आसपासची.          त्यावेळी अजूबाजूची माणसं आपल्याला जगात गर्क असतात, पुरुषमाणुस कात टाकायला आलेल्या सापासारखा सुस्तावलेला असतो.            पाण्याअभावी सुकत चाललेल्या झाडांची मुळे जशी ओलाव्याच्या शोधात असतात तशा या व्यक्ती आपलकीच्या, मायेच्या शब्दाच्या शोधात असतात. पैशापेक्षा माणसाच्या साठवणुकीचे महत्व कळते ते याच वेळी.          एवढ्या वर्षाच्या वाटचालीत असंख्य हितशत्रू खात्यात जमा झालेले असतात.           नाटकांमध्ये वर्षानुवर्षे चिल्लर काम करणारा नटही "मी गणपतराव बेलवलकर लिलया उभा करीन" या घमेंडीत असतो, तशीच ही माणसं ही मी कोणत्याही परिस्थितीला यशस्वीपणे हाताळू शकतो या अहंगंडाला कुरवाळत असतात.           अशा वेळेला दगडाला शेंदूर फासणारी आजूबाजूला वावरतच असतात, अती झाला की दगडाला फासलेला शेंदूर ही कधीतरी ओघळतो तशीच ही माणसं ही ...
विरुन गेलेले शब्द मनात घोळवत राहतं कुणीतरी संपलेल्या मैफलीची भैरवी आळवत राहतं कुणीतरी, बुडून गेलेल्या जहाजाच्या शिडामध्ये वारा भरण्याची वाट पहात राहतं कुणीतरी.