Skip to main content

Posts

Showing posts from April, 2021

अबोल प्रेम

अधीर प्रेम माझे पापणी आड दडलेले, तिच्या एका नजरेने  ओठांवर सजलेले.

आठवण

आठवणीचा ऋतू जेव्हा जेव्हा पालटतो, तेव्हा  तेव्हा जीवनात अनखो रंग भरतो. डोळ्यांमध्ये आसू नाहीतर गालावरती लाली, प्रत्येक ऋतूची  कहाणी निराली. ऋतू बदलत असताना आपण सावरायला हवं, काही घट्ट धरताना काही सोडायला हवं. कोणता रंग जपायचा आपल्या हातात नसतं, आपण किती जपलय यावर जीवन आपलं ठरतं.

गुढीपाडवा शुभेच्छा

हस्तक्षेप-दुसऱ्या ग्रहावरील सजीवांचा

कोणीही उगाच गमजा मारुच नये,रॉकेट सायन्सवाल्यांंनी पण. प्रत्येक सायन्सला लागणारे ज्ञान,  तंत्रज्ञान, साधने वेगवेगळी असतात.         रॉकेट सायन्सवरुन मनात आले, पृथ्वीवरची माणसं आपल्या तंत्रज्ञानाच्या जोरावर दुसऱ्या ग्रहांवर जायचे प्रयत्न करत आहेत, त्याचे मुख्य कारण बेसुमार वाढणारी लोकसंख्या आणि कमी पडत जाणारी साधनसंपत्ती.           त्यांना रोखण्यासाठी दुसऱ्या कोणत्या प्रगत ग्रहावरील सजीवांनी पृथ्वीवरच्या माणसांना पृथ्वीवरच रोखायचा प्रयत्न सुरु केला असेल तर ?

संध्याकाळ

नको वाटे संध्याकाळ शब्दांचेच वाटे ओझे, दिसभर पेरलेले भुतं होवून मनी नाचे. नको वाटे संध्याकाळ मौनाची ती कातळवेळ, आपुलकीच्या उत्साहाला काळोखचे ग्रहण. नको वाटे संध्याकाळ मावळतीचे रंग दावी, मनीच्या डोहावर व्याकुळतेची शेवाळ येई. नको वाटे संध्याकाळ रातीची ती पाऊलवाट, नित्य नव्याने जायचे त्या अनोळखी जंगलात.

पाठांतर

"पाठांतर हे खिशात खुळखुळणाऱ्या रोकडीसारखे आहे" हे वाचल्यापासून इंग्रजी डिक्शनरी किंवा मराठी शब्दाकोश उघडताना एटिएममध्ये कार्ड सरकवत असल्यासारखे वाटते.
जरा सी हवा बदल जाती जरासा पेड़ झुक जाता। तो मुमकीन था ये पत्ते हमेशा के लिए शाख़ से ना बिछड जाते।।

मनःस्वास्थ

पुलंचे "दाद" पुस्तक वाचताना एक वाक्य वाचनात आले, वेंडेल होम्स या विचारवंत आणि वैद्यकशास्त्रज्ञाने लिहिलेय.               "रोग बरा होणे ही एक जिवंत प्रक्रिया आहे. ती मनाच्या अवस्थेवर अवलंबून असते. युद्धात विजय मिळवणाऱ्या सैनिकांना झालेली जखम लवकर बरी होते, पण तसलीच जखम जर हरलेल्या सैनिकाला झाली तर ती मारक ठरते."               आत्ताच्या ह्या कठीण परिस्थितीत मनःस्वास्थ्य जपले पाहीजे हेच खरे.

आठवणी

रात्री बेरात्री डोळ्यांमध्ये रेंगाळते, आठवणीचे फुलपाखरु मनात भिरभिरत राहते.

मी ही वाचत सुटलो त्याची गोष्ट.

माझा आवडता लेखक.....           खरंच असा एकच एक लेखक येईल सांगता. वाचनाची सुरवात झाली ती चांदोबा आणि अमृतच्या आजोबांनी जपलेल्या अंकांपासून. गाडी पुढे सरकत जादूचे दिवे,उडत्या चटया हे स्टॉप घेत भा.रा.भागवतांच्या भुताळी जहाज, खजिन्याची बेटं असा खडतर मार्ग शोधत होती. शाळेतल्या बाई या सोबतच विज्ञान,इतिहास असे वेगवेगळे नवलाईचे प्रदेश दाखवत होत्या.           कधीतरी सुशींच खजिना आणि मंत्रजागर ही पुस्तकं हाती लागली आणि सुशी नावाच्या बेटावर असंख्य दिवस नवलाईची इंद्रधनुष्य अनुभवली. पु.ल.देशपांडे, व.पु.काळे,द.मा.मिरासदार, द.पा.खांबेटे हे झुळझुळणारे झरे तहान भागवत होतेच.           छोट्या गावातल्या छोट्या वाचनालयामुळे एकाच ठिकाणी अडकून राहणे शक्यच नव्हते. श्रिकांत सिनकर, बा.सि.अष्टिकर, व.कृ.जोशी हे गुन्हेगारीचे जग हाताला धरुन दाखवत होते तेव्हाच प्रमोद नवलकर रात्रीच्या मुंबईतील झगमगाट आणि दिवसाच्या झगमगीत मुंबईतील काळाकुट्ट अंधार अधोरेखीत करत होते.           व्यंकेटेश माडगुळकर परवचा,सरवाच्या माध्यमातून स...