महाभारतीय युद्ध संपल्यावर, श्रीकृष्णाने अर्जुनाला रथातून पायउतार होण्यास सांगितले,अर्जून रथातून खाली उतरुन दूर गेल्यावर खाली उतरल्यावर श्रीकृष्ण रथातून खाली उतरले,त्याक्षणी अग्नीने रथाला आपल्या कवेत घेतले.रथ क्षणभरात जळून भस्मसात झाला.
अर्जूनाने श्रीकृष्णाला यामागचे रहस्य विचारले,श्रीकृष्णांने सांगितले, शत्रुपक्षातील अथिरथी,महारथींनी तुझा वध करण्यासाठी तुझ्यावर अस्त्रांचा मारा केला पण जोपर्यंत मी रथावर आरुढ होतो तो पर्यंत ती अस्त्र रथाला स्पर्श करु शकत नव्हती,ती रथाभोवतीच फिरत राहीले मी रथ सोडताच ती त्यांच्यामुळे रथ जळून नष्ट झाला.
जो पर्यंत विवेकरुपी श्रीकृष्ण आपल्या मनरुपी अश्वांचा लगाम धारण करुन असतो तो पर्यंतच आपला रथ योग्य प्रकारे मार्गक्रमण करत असतो. विवेकाने मनाचे लगाम सोडताक्षणी राग,लोभ,मद,मत्सर,अहंकार यासारखी अदृष्य अस्त्र आपल्या जीवनाचा रथ चुकीच्या दिशेला धावून भस्मसात होतो.
कायम जमिनीवर पाय असणारा आदर्श धुरंधर, कलियुगातही फक्त आणि फक्त ज्याच्या पाऊलखुणांवरती चालून माणसं यशस्वी होतात त्या श्रेष्ठ राजकारणी श्रीकृष्णाला मनापासून प्रणाम.
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी,
हे नाथ नारायण वासुदेव,
प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ,
मुकुंद विष्णू भगवन नमस्ते!!!
Comments
Post a Comment