Skip to main content

गंध

आठवतंय तुला, तुझ्या घरुन बाहेर पडताना,जिन्यात तू बोलण्यासाठी वळलीस,तुझ्या केसांचा मऊ,मुलायम,नाजूक स्पर्श माझ्या गालावर रेंगाळून गेला.
      मृदगंध हा माझा सर्वात जास्त आवडणारा गंध पण त्या क्षणी तुझ्या केसांच्या सुगंधाने क्षण भारुन टाकला तो आजपर्यंत मनात भरुन राहीलाय.
       हा सुगंध आयुष्यभरासाठी जपण्याची धडपड चालू असतानाच हात सुटून गेला कायमसाठी.
      पाऊस येतो नव्याने दरवर्षी, मृदगंधाला घेवून येतो, पण तू ? एका वळवाच्या पावसाने कायमचा दुरावलीस, पाऊस जसा दुरावतो आणि जमीनीला शुष्क,ओसाड बनवून जातो तशीच,तुही वैराण वाळवंट बनवून गेलीस. जणू ते ओघळलेले अश्रू शेवटची सही होती आपल्या नात्याच्या कागदावरची.
       तू नाही पण त्या सुगंधाने मात्र वचन पाळले आहे साथ करण्याचे, त्या सुगंधाला अमरतत्वाचे वरदान मिळाले आहे जणू, मनाच्या कुपीत दरवरळत आहे,तो शेवटपर्यंत तसाच राहील.
        शेवटपर्यंत........

---- अभय बापट

२८/०३/२०२३

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४