Skip to main content

Posts

Showing posts from February, 2021

ऋतू

ज्याने त्याने ल्यावे आपापले ऋतू उसन्या उबेवरी रुजू नये. आपुलेच मुळ करावे बळकट, उसन्या आधारा धावू नये. आपुला आनंद आपुल्याच गाठी उसन्या शब्दा पोटी फुलू नये.

राष्ट्रीय विज्ञान दिन

२८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. चेंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या कर्तबगारीला सलाम करण्यासाठी गेली कित्येक वर्ष म्हणजे १९८७ पासून विज्ञान दिन साजरा केला जात असला तरी सोशल मिडीयाच्या ताकदीने सर्वसामन्य लोक या दिवसाशी जोडली गेली.          २८ फेब्रुवारी १९२८ याच दिवशी रमण यांंनी आपला शोध निबंध प्रसिद्ध केला.          रामन इफेक्ट म्हणजे काय ?          आपण दिवाळीत बघतो, घराबाहेर फटक्यातील बॉंबचा जोरदार स्फोट झाला की घरातील लहान मोठी भांडी कंप पावतात व त्यांचा नाद आवाज येतो,हा आवाजाचा परिणाम. पदार्थातील रेणू अत्यंत संवेदनशील असतात,प्रकाशाला कंपने असतात. वस्तूवर प्रकाश झोत पडला की तर वस्तूतील रेणू कंप पावते, क्षणानंतर ती कंपने आत घेतलेला प्रकाश परत बाहेर टाकतात,प्रकाशाचे विकिरीण करतात, निमिषार्धात होणाऱ्या या प्रकाशाच्या विकिरणांचे संशोधन रमण यांनी केले हाच रामण इफेक्ट.          प्रत्येक पदार्थातून प्रकाशाचे विकिरण होण्याचे प्रमाण वेगवेगळे असते.       ...

मी मराठी-

माझ्या मराठीचा टिळा  मी लाविला कपाळी, हिच्या शब्दांचा सुगंध मी कौतुकाचा धनी. इथे जे जे मिळाले त्या फक्त मराठीमुळेच. कोणालाही न बघता,न भेटता जे संचित जमा झाले ते देवी सरस्वतीच्या या दुधामुळेच. कधीकधी चुकीच्या संस्कारांमुळे हे अमृतही नासू पाहात होते पण त्या प्रत्येक क्षणी सरस्वतीची लेकच कान उपटायला आणि धपाटा घालायला पुढे सरसावली. लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी.

अंधश्रद्धा-विज्ञानाच्या सहाय्याने जोपासलेल्या

जाणीवपूर्वक आपल्या समाजात जोपासल्या गेलेल्या वैज्ञानिक अंधश्रद्धा.    अमेरिकेसारखे देश कधीच कुणाचे नसतात , " कापल्या करंगळीवर मुतणार नाही ", असे वर्णन जे कोकणात सर्रास केले जाते ते अमेरिकेसाठी चपखल बसते.   याच अमेरिकेने कधीकाळी कॉण्ट्रॅक्ट फार्मिंग सहाय्याने चीन मधील परंपरागत धान्य उत्पादन आणि पशुपक्षी पालनाची काशी करुन आयातीची वेळ आणली होती. चीन त्या अनुभवातून शिकला पण भारतीय "मोडू पण वाकणार नाही" या राष्ट्रीय ब्रीदामुळे कधीच चुकांवरून शिकायला तयार नसतात.   खरं म्हणजे आपल्यासाठीही अमेरिकेचे-पाश्चात्यांचे खेळ नवीन नाहीत, तेथील संशोधक सरकारच्या धोरणांना सोयिस्कर ठरतील असेच निष्कर्ष काढण्यात वाकबगार आहेत.    भारतात पुर्वीपासून वापरले जाणारे शेंगदाणा- तिळाचे तेल अपायकारक असल्याचे लोकांच्या मनात भरवण्यासाठी कोलेस्ट्रॉलचा बागुलबुवा उभा करण्यात आला, हृदयासाठी धोकादायक असे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितले गेलेले पाम तेल आणि सोयाबीन तेल इथे रुजवण्यात आले. आत्ताच पाम तेलाच्या आयातीवर बंदी घालण्यात आली ही खरे तर संधी होती आपली पारंपरिक खाद्यतेलांकडे लोकांना वळवण्य...

नाते-- जमीन आणि पाण्याचे

मुसळधार पावसाची सर बनून ती धावत येते, रेडकोटचा अडथळा हळूवार हाताने बाजूला सारत चिंब भीजवून टाकते.    आणि    मग निघूनही जाताते ओहोटीचे पाणी बनून, ज्या आवेगाने येते त्याच वेगाने. सोबत किनाऱ्यावरच्या वाळूचे स्वत:चे असते ते असे सर्व काही,घेवून जाते. आधीपासून किनाऱ्यावर उमटलेल्या नक्षीदार पाऊलखुणा उध्वस्त करत. पाणीच ते निःसंग, रंगहीन. समर्पित होणे आणि मुक्त होवून जाणे पाणीच जाणे.    जमीन मात्र होता होईतो अंतरंगात आठवणी जपत राहते, पृष्ठभागावर रुक्षतेचा मुखवटा पांघरुन. 

सोशल लाईफ

माणूस प्रत्येक गोष्टीचा किस पाडण्यात एवढा वेळ व्यर्थ घालवतो, तो करतो कमी बोलतो जास्त.       इथे व्यक्त केलेला प्रत्येक हुंकार, इथे सोडलेला प्रत्येक सुस्कारा, कुठे तरी नोंदवला जात असतो.         सोशल फुटप्रिंट नावाची एक नवीन पायवाट इथे उदयाला येतेल. प्रत्यक्ष घडलेल्या आणि बिघडले नात्यांपेक्षा या आठवणींच्या पाऊलखुणा जेव्हा समोर येतात तेव्हा माणसं जास्त उदास होतात,तोल गमावून बसतात.         इथे किस्से घडतात आणि बिघडतात पण ते बिघडण्यातही तोल सांभाळता आला पाहीजे.          
न बोलता ही प्रेम कळावे अशी असावी स्वच्छ दिठी, मनामनातील द्वैत सरावे अशी असावी सहज मिठी.
नदीला आस लागलेली असते, सुर्याला जावून मिळावे, त्याच्या डोळ्यातील अश्रू बनून त्याच्या सान्निध्यात राहावे.         तप्त सूर्याच्या कल्पनेनीसुद्धा नदीची वाफ होवून आसमंतात हरवून जाते.         वाहत जाणे हा नदीचा धर्म, तप्त उन्हापासून तीला जपणे हा तीच्या आसपासच्या हिरवळीचा धर्म, सागराला मिळून एकरुप होणे हेच नदीचे प्राक्तन.          सरिता सागराला मिळते तेव्हाच ती पुन्हा पुन्हा जन्म घेते.         नदीला अकाली सुकू देण्यापासून थांबवणे तीच्या अजूबाजूच्या हिरव्या निसर्गावर अवलंबून असते तेवढेच आपल्या फायद्यासाठी तिला ओरबडणाऱ्यांच्या मनोवृत्तीवर पण. नदी योग्य वेळी, योग्य प्रकारे सागराला जावून मिळणे यातच खरे हित सामावलेले असते.

अमेरिकेची कुटील व्यापार निती

अमेरिकेसारखे देश कधीच कुणाचे नसतात , " कापल्या करंगळीवर मुतणार नाही ", असे वर्णन जे कोकणात सर्रास केले जाते ते अमेरिकेसाठी चपखल बसते.   याच अमेरिकेने कधीकाळी कॉण्ट्रॅक्ट फार्मिंग सहाय्याने चीन मधील परंपरागत धान्य उत्पादन आणि पशुपक्षी पालनाची काशी करुन आयातीची वेळ आणली होती. चीन त्या अनुभवातून शिकला पण भारतीय "मोडू पण वाकणार नाही" या राष्ट्रीय ब्रीदामुळे कधीच चुकांवरून शिकायला तयार नसतात.   खरं म्हणजे आपल्यासाठीही अमेरिकेचे-पाश्चात्यांचे खेळ नवीन नाहीत, तेथील संशोधक सरकारच्या धोरणांना सोयिस्कर ठरतील असेच निष्कर्ष काढण्यात वाकबगार आहेत.    भारतात पुर्वीपासून वापरले जाणारे शेंगदाणा- तिळाचे तेल अपायकारक असल्याचे लोकांच्या मनात भरवण्यासाठी कोलेस्ट्रॉलचा बागुलबुवा उभा करण्यात आला, हृदयासाठी धोकादायक असे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितले गेलेले पाम तेल आणि सोयाबीन तेल इथे रुजवण्यात आले. आत्ताच पाम तेलाच्या आयातीवर बंदी घालण्यात आली ही खरे तर संधी होती आपली पारंपरिक खाद्यतेलांकडे लोकांना वळवण्याची पण आयुर्वेदाचे प्रचारक, आयुर्वेदिक औषधांचे निर्माते, योगगुरुंनी पाम तेल निर...

कधी वाटते......

कधी वाटते वाटते  तुला द्यावे असे काही,  आठवणीच्या जगात  उजळतील दिशा दाही. कधी वाटते वाटते वाटते असे काही घडावे  स्वप्न आणि सत्यातले  सारे अंतर सरावे. कधी वाटते वाटते असे नवल घडावे, तळहातांच्या जखमांचे प्राजक्ताचे फुल व्हावे.