Skip to main content

अमेरिकेची कुटील व्यापार निती

अमेरिकेसारखे देश कधीच कुणाचे नसतात , " कापल्या करंगळीवर मुतणार नाही ", असे वर्णन जे कोकणात सर्रास केले जाते ते अमेरिकेसाठी चपखल बसते.
  याच अमेरिकेने कधीकाळी कॉण्ट्रॅक्ट फार्मिंग सहाय्याने चीन मधील परंपरागत धान्य उत्पादन आणि पशुपक्षी पालनाची काशी करुन आयातीची वेळ आणली होती. चीन त्या अनुभवातून शिकला पण भारतीय "मोडू पण वाकणार नाही" या राष्ट्रीय ब्रीदामुळे कधीच चुकांवरून शिकायला तयार नसतात.
  खरं म्हणजे आपल्यासाठीही अमेरिकेचे-पाश्चात्यांचे खेळ नवीन नाहीत, तेथील संशोधक सरकारच्या धोरणांना सोयिस्कर ठरतील असेच निष्कर्ष काढण्यात वाकबगार आहेत. 
  भारतात पुर्वीपासून वापरले जाणारे शेंगदाणा- तिळाचे तेल अपायकारक असल्याचे लोकांच्या मनात भरवण्यासाठी कोलेस्ट्रॉलचा बागुलबुवा उभा करण्यात आला, हृदयासाठी धोकादायक असे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितले गेलेले पाम तेल आणि सोयाबीन तेल इथे रुजवण्यात आले. आत्ताच पाम तेलाच्या आयातीवर बंदी घालण्यात आली ही खरे तर संधी होती आपली पारंपरिक खाद्यतेलांकडे लोकांना वळवण्याची पण आयुर्वेदाचे प्रचारक, आयुर्वेदिक औषधांचे निर्माते, योगगुरुंनी पाम तेल निर्मीतीमध्ये उडी मारली.
  आयुर्वेदाने पुर्णांन्न म्हणून गौरवलेले गाई-म्हशीचे दुध कसे माणसांसाठी अयोग्य आहे हे सांगणारे संशोधन अमेरिकेतूनच भारतात आले आणि कृषीप्रधान, आयुर्वेदाच्या जन्मभूमी भारताच्या मंत्र्यांनी त्याचा प्रसार करत सोया दूध भारतात रुजवण्याचा प्रयत्न केला.
  दुधाला दूर लोटत आपण फूड सप्लिमेंट आणि बेबी फुडच्या मागे धावत सुटलोय, यामध्ये कोणत्या कंपन्या आज आघाडीवर आहेत ?
   पिढ्यानपिढ्या नवजात बालकांना तेल मालिश, काजळ,तिट लावणे, धुप देणे याला पाश्चात्य वैद्यकशास्त्र विरोध करते, याबाबत आपले डॉक्टर तर अतिरेकी कट्टरता दाखवतात. आज बेबी केअर प्रॉडक्टच्या उत्पादनात कोणत्या कंपन्या आघाडीवर आहेत ?, 
   अशीच असंख्य उदाहरणे सापडतील,असेच जर होत राहील तर भारतात नेहमी वापरल्या जाणाऱ्या कितीतरी पदार्थांचे उत्पादन भारतातून एकतर बंद होईल किंवा ते अनावश्यक गोष्टींसाठी वापरले जाईल आणि आपल्याला ते पदार्थ अमेरिकेकडून आयात करावे लागतील,जे चिनमध्ये घडले होते.
  भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ ताब्यात ठेवण्यासाठी अमेरीकेसारखा विकसित देश कोणत्याही थराला जावू शकतो आणि सुशिक्षित भारतीयात बुद्धीभ्रंश निर्माण करण्यासाठी तिथले संशोधक कोणतेही भ्रमित करणारे निष्कर्ष समोर मांडू शकतात.
  
  
  

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४