Skip to main content

Posts

Showing posts from July, 2021

देवाची सोबत

एखादी छोटीशी चुक कायम सलत राहते,अशा वेळी वाटतं देव सोबत असावा,ती चुक दुरुस्त करण्याची संधी देण्यासाठी, फक्त एक संधी,तेवढाच मार्ग त्याने दाखवावा.

भावना आणि श्रद्धा

कसे सांगू "काळजी घ्या" अनेकांना ते मुर्खपणाचे वाटते.         कसे सांगू "सर्व ठिक होईल, देव पाठीशी आहे" नास्तिकांना हे अडणीपणाचे वाटते. आपण शब्दांनाकडे चौकसपणे बघताबघता त्यामागच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो. इंटरनेटमुळे जग जवळ आल्यापासून एवढ्या अनपेक्षित घटना, संकटे बघायला मिळतायत की आपण भावनाहीन बनत चाललोय.        हेच सर्व इंग्लिशमध्ये म्हटलं की मात्र आपल्याला गोड वाटते.         पण जिथे आपण स्वत: मदतीला जावू शकत नाही तिथे या भावनाच लाखमोलाच्या असतात. देव संकटात मदतीला येईल हा विश्वास पुढे जायला, जोखिम पत्करायला आधार देतात, " कोणतीही जोखिम न पत्करणे हीच मोठी जोखिम आहे" असे पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर बर्नाड यांनी म्हटले आहे. कोणीतरी अशा विश्वासाने पुढे जात असेल ते बघून एखाद्या माणसातली माणूसकी जागी होवून तो मदतीला येतो, तेव्हा आपण म्हणतो," अगदी देवासारखा धावून आला"         भावना कुचकामी नसतात, एखादी श्रद्धा जर मानसिक आधार देत असेल तर तिला टाकाऊ का समजावे ? आपली संस्कृती याच एकमेकांविषयी वाटणार...

बातमीचा प्रवास

बातमीचा प्रवास       जवळपास महिन्यांपूर्वी एबीपी माझावर महाड-भोर रस्त्यावर घाटात बिबट्या दिसल्याची बातमी आणि व्हिडीओ दाखवला.        आमच्या इथे येताना तो व्हिडीओ अलिबाग बाहेरच्या कार्लेखिंडीत बिबट्या दिसला अशी झाली.           पुढे आमच्या गावातील व्हॉट्सअपवर येताना ती बातमी गावाबाहेरच्या डोंगरावर बिबट्या दिसला अशी झाली.            नशीब गावातील आमच्या भागात डोंगर,टेकडीच सोडा, साधी राई सुद्धा नाही नाहीतर त्या राईचा पर्वत करुन त्या बिबट्याला त्या पर्वतावर उभा केला असता.            प्रत्येक गोष्ट किहीतरी शिकवत असते, प्रत्येक क्षण आपला गुरु असतो, बातमी फॉरवर्ड करताना जबाबदारीने करावी एवढीच शिकवण आपण शिकलो तरी गुरुपौर्णिमा साजरी झाली समजायचे.

सल्ला

आपला कल काय कर हे सांगण्यापेक्षा काय करु नको हे सांगण्याकडे असतो. खरा मार्गदर्शक तोच असतो जो कोणाता मार्ग निवडावा यासाठी मार्गदर्शन करतो.           इथे फेसबुकवरही लोकांच्या टिंगलटवाळीच्या पोस्टवरुन,कॉमेंट्सवरुन काय करु नये याचेच क्लासेस चालवलेले दिसतात.           कोणाची काळजी करण्याची गरज नाही, प्रत्येकजण स्वत:ची काळजी घेतच असतो. हे इथेच समजते.             इथे कोणाशी नाती जोडू नयेत हे ज्ञानही इथेच दिले जाते.             मला आठवतेय पाच-सात वर्षांपूर्वी एका ८२ वर्षांच्या गृहस्थांना कॉमेंटमध्ये काका म्हणालो तेव्हा ते ताडकन म्हणले," नाते जोडण्याची गरज नाही, आपण इथे फ्रेंड आहोत तेवढेच बास आहे".              मग मी विचारले, "म्हादू, रत्नागिरीत कुठे राहतोस रे?" तर तो दोस्त रागवून अनफ्रेंड करुन गेला, माझं काही चुकला का ?             पण एक धडा मिळाला पहिल्याच ओळखीत नातं जोडू नये आणि वय बघून तर कधीच नको.

विठ्ठल

कधी वाटते नसते काही दिवस-रात्र असले काही, विठ्ठलाच्या पाया पाशी युगे सरती साही. विटे वरती उभा तो स्थिर बुद्धीचा दाता ग, तुझे माझे विसरुन सारे हाक मारुया आता ग. आपत्तीच्या वाटा सरुन सुख समाधान येवू दे, चालता चालता वाटेवरती विठ्ठल निधान भेटू दे.

विठ्ठल

कधीतरी देवा तुझ्या पायाशी यायचयं, चंद्रभागेमध्ये नाही तुझ्या प्रेम रसात नहायचयं. तुझ्यामाझ्यातला देवा भेद सारा सरु दे, तुझ्या सावलीत सारे आयुष्य माझे सरु दे. नाही अभंग,  नाही गाथेच्या ओळी, तुझ्या श्वासाच्या तालावर सारे आयुष्य झुलू दे. सारे संशय सारे किंतू सरु दे देवा माझ्या श्वासामध्ये फक्त तुझे नाव उरु दे.

आशा

मुळावर घाव घालून अस्तित्व मुळीच सरत नाही, नवीन कोंब अवतरतोच स्वप्न कधीच मरत नाही.

शेवटचा अभंग

माझीया चुकांचे माझ्या हाती खापर त्याचे चटके फार देवू नको रे. तू घनू अमृताचा औषधी जीवांचा तुझा रेशीमहात फिरु दे रे. नको आता देवू विरहाचे दु:ख तुझ्या कुशीमध्ये सामाव रे. एकाकी हा जीव एकाकी तू देव दोघांचे अद्वैत घडो दे रे.

रंग दु:खाचे

जूने दु:ख उगाळणे बरे नव्हे तेच ते रडगाणे गाणे बरे नव्हे, किती रंग आहेत जीवनात या नव्यात जूने रंग मिसळणे बरे नव्हे.

स्वातंत्र्य-तिचे माझे

ए ऐक ना !       तुला आधीच सांगितले होते,तुझा पराजय अटळ आहे.        तुला इथे स्वातंत्र्य असते ते त्यांनी ठरवून दिलेल्या परिघातच. कधीतरी हा लहान मोठा होतो पण परिघातच भरारी घेणं हे अटळ प्राक्तन आहे तुझे.         कधी हा परिघ उंबऱ्याच्या आत असतो तर कधी थोडाफार मोठा पण असीम,अथांग कधीच नसतो.          तुझ्या जोडीदाराच्या स्वप्नाची झेप जेवढी उत्तुंग असले तेवढेच जास्त आकाश तुझ्यासाठी खुले असेल,त्याच्या उंच भरारीत त्याला सावरायला, सांभाळायला कोणीतरी सोबत हवे म्हणूनच.           संस्कारांच्या पाऊलखुणांच्या आतच शोधावे लागेल तुला आत्मसन्मान, त्याच्या बाहेर गेलीस, अगदी शब्दांनी सुद्धा तर पावलोपावली तुला अग्निपरीक्षा द्यावी लागेल.             असे निसरडे रस्ते या आधी अनेकांनी पायी तुडवले तेव्हाच तेथे वहिवाट चालू झाली जर कोणीच या रस्त्यांवरुन चालले नाही तर अविचारांचे शेवाळ त्यांना आणखीन निसरडा करणार,तू ठामपणे चालत राहिलीस तर उद्या अनेकजणी तुला समजून घेणाऱ्या विश्वासाने च...

प्रतिक्षा

सहवासाची भूक, सोबतीने मिटवू या कल्पनेच्या तीरावरुन हे न्याहाळणे कशाला! आषाढही बरसून गेला, नभही निरभ्र झाले तुझ्या माझ्या मनातल्या ऋतूंचा संहार कशाला! उमलू दे बाग सारी, सुगंधाने दिशा भरू दे. एक थेंब अत्ताराची आणखी प्रतिक्षा कशाला! अस्तित्वाची ही लढाई,शब्दांनीच लढूया भावनांच्या खाली निवृत्तीचे वादळ कशाला!

निरर्थकाची डायरी ८

निरर्थकाची डायरी...... माणसं कसली कसली ओझी डोक्यावर घेवून जगत असतात.        काही स्वत:च्या आनंदासाठी,वेळ आनंदात जाण्यासाठी टिव्ही बघतात आणि सिरियलमधेच गुंतून पडतात. दिवसभर त्या सिरियल्सची वाट बघणं, त्या गोष्टींचाच विचार करत बसणे.         दुसऱ्या प्रकारची लोक, त्यांना या सिरियल्स अजिबात आवडत नाहीत, त्या सिरियल्सचा द्वेष करतात, त्या चालू असताना टिव्हीसमोर बसणे ही त्यांना जमत नाही.          खरे म्हणजे या सिरियल बघणे म्हणजे निव्वळ हमाली, खोट्या गोष्टीतील सुख-दु:खाच्या भावनांचे ओझे स्वत:च्या माथी घेणे.          कोणताही हमाल डोक्यावरचे ओझे विनाकारण डोक्यावर वागवत नाही,वेळ आली की डोक्यावरुन उतरवून टाकतो,मोबदला खिशात सारतो, पुढे सरतो.          तसेच त्या सिरियलमुळे झालेला आनंद किंवा मानसिक त्रास ही त्या ओझ्याची बिदागी समजून ते ओझे माथ्यावरुन उतरवून टाकले पाहीजे.          प्रत्येकवेळी मनपसंद मोबदला मिळेल किंवा नाही,तरी योग्य क्षणी ते ओझे उतरवणेच सर्वोत्तम मा...