सहवासाची भूक, सोबतीने मिटवू या
कल्पनेच्या तीरावरुन हे न्याहाळणे कशाला!
आषाढही बरसून गेला, नभही निरभ्र झाले
तुझ्या माझ्या मनातल्या ऋतूंचा संहार कशाला!
उमलू दे बाग सारी, सुगंधाने दिशा भरू दे.
एक थेंब अत्ताराची आणखी प्रतिक्षा कशाला!
अस्तित्वाची ही लढाई,शब्दांनीच लढूया
भावनांच्या खाली निवृत्तीचे वादळ कशाला!
Comments
Post a Comment