Skip to main content

भावना आणि श्रद्धा

कसे सांगू "काळजी घ्या" अनेकांना ते मुर्खपणाचे वाटते.
        कसे सांगू "सर्व ठिक होईल, देव पाठीशी आहे" नास्तिकांना हे अडणीपणाचे वाटते.
आपण शब्दांनाकडे चौकसपणे बघताबघता त्यामागच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो. इंटरनेटमुळे जग जवळ आल्यापासून एवढ्या अनपेक्षित घटना, संकटे बघायला मिळतायत की आपण भावनाहीन बनत चाललोय.
       हेच सर्व इंग्लिशमध्ये म्हटलं की मात्र आपल्याला गोड वाटते.
        पण जिथे आपण स्वत: मदतीला जावू शकत नाही तिथे या भावनाच लाखमोलाच्या असतात.
देव संकटात मदतीला येईल हा विश्वास पुढे जायला, जोखिम पत्करायला आधार देतात, " कोणतीही जोखिम न पत्करणे हीच मोठी जोखिम आहे" असे पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर बर्नाड यांनी म्हटले आहे.
कोणीतरी अशा विश्वासाने पुढे जात असेल ते बघून एखाद्या माणसातली माणूसकी जागी होवून तो मदतीला येतो, तेव्हा आपण म्हणतो," अगदी देवासारखा धावून आला"
        भावना कुचकामी नसतात, एखादी श्रद्धा जर मानसिक आधार देत असेल तर तिला टाकाऊ का समजावे ? आपली संस्कृती याच एकमेकांविषयी वाटणाऱ्या भावनांवर, या श्रद्धेच्या पायावर उभी आहे,टिकून आहे.

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४