एक फेसबुकवरची छोटी बहिण कायम पावसावर खार खाऊन असायची, द्वेषद्वेष करायची पावसाचा. दोघांचा दरवर्षी उंदारा-मांजराचा खेळ चालू असायचा.
यावर्षी बघतले तर,तिच्या व्हॉट्सअप सेटस्मध्ये पाऊस अलवारपणे रेंगाळताना दिसतोय.
तेव्हा जाणवले,झालीच की आता २७ वर्षांची, हे वयच असे असते, नेहमी चिखल म्हणून कंटाळा करणारी मुलं, आपल्या पावलांशेजारी उमटलेली पावलांची नक्षी बघून गालातल्या गालात हसतात.
नेहमी पावसाचा एक थेंब ही अंगावर येवू न देणारी, स्वत:च्या भिजणाऱ्या खांद्याकडे दुर्लक्ष करीत छत्री दुसऱ्याकडे सरकवीत राहतात.
तिला धोधो पावसात भिजलेला तो सलमान खान सारखा सिक्स पॅकवाला वाटतो तर त्याला ती भिजलेली कोंबडी न दिसता तीच्या केसांतून ओघळणारे मोती अलगद ओंजळीत जमा करावेसे वाटतात.
पाऊस तोच असतो, बालपणी होड्यांच्या शर्यतीसाठी नदीसारखा भासतो.तरुणही दोघांना सोबत स्वप्नाच्या नगरीत घेवून जातो.
नंतर तो जीवननौका पार करुन देणारा सागर असतो तर वृद्धांना पैलतीरी पोचवणारा देवदूत.
पाऊस तोच असतो पण बघणा-या स्वप्नील डोळ्यांना त्याच्या अथांग पडद्यावर वेगवेगळी स्वप्न उमटलेली दिसतात.
आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५
Comments
Post a Comment