Skip to main content

पाऊस

दरवर्षी प्रमाणेच तो आतूरतेने धावत आला, वर्षातून एकादाच यायची संधी मिळालयची,कितीही आतूरता असली भेटीची तरी दोघांमध्ये एक अदृष्य भिंत तयार होतच असे दरवर्षी, त्या आठ महिन्यांच्या दूराव्याने.
         त्याच्या आगमनाने ती प्रफुल्लित झालीच,लाज हा तिचा दागिना मिरवत सलज्जपणे उभी राहीली त्याने पाऊल पुढे टाकण्याची वाट बघत.
         तोही काहीक्षण तीचे रुप निरखत दूर उभा राहीला, पण त्याल्या पुढे पाऊल टाकणे भाग होतेच.
          त्याची आतुरता, त्याचा आवेग तिला नवीन नव्हता, हा अनुभव ती वर्षानुवर्षे घेत होती, पण यावेळचा त्याचा आवेग अचाट म्हणावा लागेल असाच आहे.
          त्याचा आवेग सहन करण्याची ताकद तिला मिळू दे, कारण तो परदेश प्रवासासाठी निघूनही जाईल पण थकले भागलेली ती जर कोलमडून पडली तर तीच्या कच्च्याबच्च्यांनी कोणाच्या तोंडाकडे बघावे.
          शेवटी प्रत्येक "ती" क्षणभराची पत्नी असली तरी अनंत काळची "माता" आहे .
          तीला सावरायलाच हवे, उभे राहायलाच हवे.कारण शेवटी ती सर्वांना धारण करणारी धरित्री आहे.

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४