समजतंय का तुला,
भारतात या हिंदूस्थानात जन्म घेतलास हे तुझे सौभाग्यच. नाही, हे नेहमीसारखे गुळगुळीत वाक्य नाही.
जगातील प्रत्येक स्त्रीला स्वत:चा हक्क, मानसन्मान मिळवण्यासाठी लढावे लागले हे खरे पण हिंदूस्थानातील परिस्थिती सगळ्या जगापेक्षा वेगळी होती.
"जिथे स्त्रीचा सन्मान केला जातो तिथे देवता वास करतात", या शब्दात स्त्रीयांना सन्मान आपल्या संस्कृतीत दिला गेला.
हिंदूस्थानी संस्कृत ऐहिक सुखासाठी आवश्यूअसलेल्या विद्या,धन आणि शक्ती या तिन्हींची देवता म्हणून सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांना मान दिलेला आहे.
नंतर हा मान सन्मान हरवत गेला तरी भारतीय स्त्रीसाठी हे सोनेरी शिखर कायमच मार्गदर्शन करत होते.ध्येय माहिती होते, मार्ग माहीती होता,त्या काट्याकुट्यातून रस्ता काढणे एवढाच संघर्ष भारतीय स्त्रीला करावा लागला, तिथेही त्यांच्यासाठी सुविचारी पुरुषांची साथ मिळत होतीच.
गौरव, बंधन, संघर्ष आणि पुनरुत्थान या मार्गाने भारतीय स्त्रीचा यशस्वी आगेकूच चालूच आहे. या देवीच्या रुपांना पुन्हा बंधनात अडकवू नये एवढा सारासार विचार समाजाने केला तरच संस्कृतीचा विकास होणार आहे कारण
स्त्री हीच संस्कृतीचा आधारस्तंभ,संवर्धक, जपणूक करण्याचा काम करते.
स्त्रीचा सन्मान म्हणजेच संस्कृतीचा अभिमान.
---- अभय बापट
०७/०३/२०२६
Comments
Post a Comment