Skip to main content

स्त्रीचा सन्मान हाच संस्कृतीचा अभिमान

समजतंय का तुला, 
          भारतात या हिंदूस्थानात जन्म घेतलास हे तुझे सौभाग्यच. नाही, हे नेहमीसारखे गुळगुळीत वाक्य नाही‌.
          जगातील प्रत्येक स्त्रीला स्वत:चा हक्क, मानसन्मान मिळवण्यासाठी लढावे लागले हे खरे पण हिंदूस्थानातील परिस्थिती सगळ्या जगापेक्षा वेगळी होती.
           "जिथे स्त्रीचा सन्मान केला जातो तिथे देवता वास करतात", या शब्दात स्त्रीयांना सन्मान आपल्या संस्कृतीत दिला गेला. 
            हिंदूस्थानी संस्कृत ऐहिक सुखासाठी आवश्यूअसलेल्या विद्या,धन आणि शक्ती या तिन्हींची देवता म्हणून सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांना मान दिलेला आहे.
             नंतर हा मान सन्मान हरवत गेला तरी भारतीय स्त्रीसाठी हे सोनेरी शिखर कायमच मार्गदर्शन करत होते.ध्येय माहिती होते, मार्ग माहीती होता,त्या काट्याकुट्यातून रस्ता काढणे एवढाच संघर्ष भारतीय स्त्रीला करावा लागला, तिथेही त्यांच्यासाठी सुविचारी पुरुषांची साथ मिळत होतीच.
             गौरव, बंधन, संघर्ष आणि पुनरुत्थान या मार्गाने भारतीय स्त्रीचा यशस्वी आगेकूच चालूच आहे. या देवीच्या रुपांना पुन्हा बंधनात अडकवू नये एवढा सारासार विचार समाजाने केला तरच संस्कृतीचा विकास होणार आहे कारण  
स्त्री हीच संस्कृतीचा आधारस्तंभ,संवर्धक, जपणूक करण्याचा काम करते.
स्त्रीचा सन्मान म्हणजेच संस्कृतीचा अभिमान.
               
---- अभय बापट
०७/०३/२०२६

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४