Skip to main content

आयुष्य

दगडालाही फुटे पाझर
असे येतात काही प्रहर,
तरी माझ्या बोटांमधून
का न येई शब्दांचा पाझर.

तप्त उन्हाच्या वाटेवरती 
काही झाडांना येतो बहर,
आणि माझ्या आयुष्याला
का सुचे ही उफराटी लहर.

शहाणपणाचे वागणेही
कधी मुर्खपणाचे वाटे,
शांत,तृप्त निसर्गाला
वाटेवर वादळवारा गाठे.

कुठून येतो घेवून जन्म
हळवे रंग या भूमीवर,
बेरंग या आयुष्याला
कोण उधळतो धरणीवर.

कसे भाळतो मीपणावर
ओळख नसता आपली आपण
का धावतो पाठी पाठी 
मनावरती ठेवून दडपण.

-----अभय बापट
०७/०५/२०२६

Comments

Popular posts from this blog

शिवरायांचा आठवावा प्रताप

शिवरायांचा आठवावा प्रताप....                शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचे सलगी देणे कैसी असे.                शिवरायांची सलगी देणे, माणसांशी, परिस्थितीशी,प्रसंगांशी आठवणे, त्याचे आचरण करण्याचा प्रयत्न करणे हिच महाराजांना खरी आदरांजली. पण आपल्या समाजाचे झालेय काय, आपण आपल्या आदर्शांना, सर्वोत्तम नेतृत्वांना देवत्व बहाल करुन, त्यांच्या गुणांचे, त्यांनी आचरणात आणलेल्या विचारांचे, त्यांनी दाखवलेल्या मार्गाचे आचरण करण्यातून मुक्त होतो.                मुक्त होतो आर्ततेने साद घालायला, महाराज पुन्हा जन्म घ्या.                 शिवरायांनी बालवयात आपल्या बालसवंगड्यांच्या मनात पराक्रमाची ठिणगी पेटवली, असंख्य ज्ञात अज्ञात मराठी मनाच्या हंकारातून त्याचा वडवानल झाला.                 पण ती एकदा पेटवलेली ठिणगी जपण्यासाठी शिवरायांना कितीजणांना सलगी द्यावी लागली, किती कठिण प्रसंगातून पार पडावे लागले, कि...

बळ पंखातले

नाही मिळत कोठे उसने पंखामधले बळ ठेव पाय भुईवर आणि भर कवेत आभाळ नाही देत कोणा कोणी फुकटची साऊली बांध घरटे उबेत आणि हो जगाची माऊली. नाही देत कोणी फुका ज्ञानाचा प्रकाश हो सावित्रीची लेक आणि धर पुस्तकांचा ध्यास. नाही उगाच दरवळत जीवनाचे चंदन मान ठेव श्रमांचा आणि कर सत्याला वंदन. नाही मिळत सहज कुणाला कीर्तीचे ते धन जप ध्येय मनाशी आणि कर परिश्रम साधन. नाही घालत उगाच गळ्यामध्ये यश किर्तीचा हार ठेव जिद्द मनामध्ये आणि घाल अंधारावर वार. --- अभय बापट ०८/०३/२०२६

पंखांमधले बळ

नाही मिळत कोठे उसने पंखामधले बळ ठेव पाय भुईवर आणि भर कवेत आभाळ नाही देत कोणा कोणी फुकटची साऊली बांध घरटे उबेत आणि हो जगाची माऊली. नाही देत कोणी फुका ज्ञानाचा प्रकाश हो सावित्रीची लेक आणि धर पुस्तकांचा ध्यास. नाही उगाच दरवळत जीवनाचे चंदन मान ठेव श्रमांचा आणि कर सत्याला वंदन. नाही मिळत सहज कुणाला कीर्तीचे ते धन जप ध्येय मनाशी आणि कर परिश्रम साधन. नाही घालत उगाच गळ्यामध्ये यश किर्तीचा हार ठेव जिद्द मनामध्ये आणि घाल अंधारावर वार. --- अभय बापट ०८/०३/२०२६