मने,
तुला चिडवण्यासाठी मंदीचे नाव घेतले, माझ्या भाचीला एवढी आठवण येतेय,उचक्या येवून मरणार बहुतेक मंदी.
खुप काही मोठं नसतं मंदी म्हणजे, स्वत:ला आवरायचं आणि वेळेवर सावरायचं की मंदी नावाचे भूत पळून जाते पार्श्वभागाला पाय लावून.
आता तूच बघ, अनुभवतोच की आपल्या नात्यातही आपण, कधी तेजी तर कधी मंदी. ९९% जणं सावरतातही त्या मंदीच्या तडाख्यातून . काहीजणं चटकन् सावरतात काही काहीजणांना वेळ लागतो, खचणारा आणि सर्वस्व गमावणारा एखादाच शंभरात.
आपल्या भावनांची गुंतवणूक कधी एकाच जागी करू नये हे साधे सोपे पथ्य पाळले की झाले.
आपल्या आनंदाची, सुख:दु:खाची गुरुकिल्ली कोणा एकाच्या हातात गेली की लागलीच आयुष्याची वाट, ती गुरुकिल्ली आपल्या हातात हवी आपण ठरवायला हवं आणि वेळीच सावरायला हवं.
आठवतयं का तुला, पंधरा-वीस वर्षांपूर्वी वैभव विळ्यांची लाट आली, कापणी करायची की वैभव विळा हवाच जणू. वैभव विळा बनवणारी एक वर्कशॉपच निघाले.
लोहारांची कोयती जणू इतिहासात हरवूनच जातेय असे वाटावे अशी परिस्थिती आली. पण ते लोहार फक्त कोयतीच बनवत नव्हते शेती घरगुती उपयोगाच्या असंख्य वस्तू बनवत होते त्यामुळे ते स्वत:ला सावरु शकतो आता वैभव विळा आणि फक्त विळे बनवणारे ते वर्कशॉप दोन्हीही बाद झाले. लोहार मात्र ठामपणे उभे राहू शकले.
एकाच जागी पाय गुंतून पडला की पुढे जाण्याचा मार्ग बंद होवून जातो हेच खरे. म्हणूनच गुंतवणूक आपल्या स्किलची, आपल्या भावनांची, आपल्या पैशाची विचारपूर्वक, योग्य ठिकाणी करावी लागते.
आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५
Comments
Post a Comment