Skip to main content

छोटीसी जख्म नासूर बन जाती है......

छोटासी जख्म नासूर बन जाती है....

      स्वातंत्र्य मिळतामिळता बंगालच्या मनावर ओरखडा उठला. स्वातंत्र्य संग्रामात बंगाली लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,पण जेव्हा लाखो बंगाली मायलेकींवर मुस्लिमांकडून अत्याचार केले गेले तेव्हा "आमच्या मदतीला कोणीही आले नाही" हा छोटासा ओरखडा बंगाल्यांच्या मनावर उठला.
      स्वातंत्र्य मिळाल्यावर पश्चिम पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या पंजाबी निर्वासितांना त्यांच्या पाकिस्तानात सोडून याव्या लागणाऱ्या मालमत्तेबद्दल नुकसान भरपाई दिली गेली.
      पण, पुर्व पाकिस्तातून स्वतंत्र भारतात येणाऱ्या बंगाली निर्वासितांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही. हे कृत्य म्हणजे बंगालच्या ताज्या जखमेवर भारत सरकारने टाकलेला मसालाच होता.
      तेव्हापासूनच बंगाली लोकांचा ओढा चीनकडे वाढू लागला.पश्चिम बंगालचा नरक बनला.कॉलेजमधली लोक टाईमपास म्हणून बस जाळू लागली,आपण सुतळी बाँब विकत घेतो तेवढ्या सहज तिथे बाँब तीथे मिळू लागले.बंगालचा सत्यनाश झाला.
      महाराष्ट्र नेहमीच सर्वांच्या मदतीला धावला पण आज महाराष्ट्र पुरात गटांगळ्या खात असतात केंद्र किंवा दुसरी कोणती राज्य मदतीला आले नाही. ही जखम मराठी माणसांच्या मनावर झालेली आज दिसतेय.
      कलम ३७० ची भिंत जमीनदोस्त केली गेली पण माणसांच्या मनात उभ्या राहीलेल्या भिंतींचे काय ? पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला पण महाराष्ट्र कर्नाटक यांच्यात उभी राहलेली भिंत भक्कम पणे उभी आहे.महाराष्ट्रातील जनता ही आपलेच बांधव आहेत हा विचार कर्नाटक सरकारने करुन धरणाचे दरवाजे उघडले असते तर एवढी गंभीर परिस्थिती उद्भवली नसती असे तज्ञ सांगतात.
     
 

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४