Skip to main content

मनाची शिट्टी

मने,
          प्रेशर कुकरची शिट्टी कशी काम करते तुला माहीतच आहे. कुकरमध्ये प्रमाणाबाहेर वाफ कोंडली जावून त्याचा स्फोट होवू नये म्हणून ही शिट्टी.
          माणसाच्या मनालापण अशी एखादी शिट्टी बसवली असती तर ? किती सहजतेने कोंडलेले मन मोकळे झाले असते.
          पण नीट बघितले तर मनालासुद्धा अशी शिट्टी असतेच. कधी एखादे ठिकाण माणसाच्या मनावरचा ताण कमी करते, कधी एखाद्या माणसाचा सहवास,  कधी एखादे हलकेसे स्मित, कधी एखादा फोन कॉल मनावरचा ताण कमी करतो.
          काल सहज छोट्या बहिणीशी बोलताना जाणवले, भडाभडा कॉलवरती बोलत होती, जणू गेल्या पाऊण महिन्यात मनात कोंडलेल्या भावनांपासून मुक्त होतेय, हे चक्क जाणवत होते.
           खरंच मनाला तणावमुक्त करु शकणारी माणसं, ठिकाणं जपली पाहिजेत, काहीजणं आपल्यासाठी या शिट्टीची भुमिका बजावत असतील तर काहीजणांसाठी आपणही त्याच भूमिकेत असू.
          सगळं काही बोलून मोकळं होता आलं पाहिजे. तेवढेच दुसरं बोलत असतान ऐकूनही घेता आले पाहिजे.
          यासाठी जास्त कशाची गरज नसते,हवा असतो तो परस्परांवर विश्वास आणि आपुलकी, तेवढी मात्र जपली पाहीजे.
            
          

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४