Skip to main content

निरर्थकाची डायरी १

निरर्थकाची डायरी 
             छोटं मुल कागदावर रेघोट्या ओढतं, त्याला काही अर्थ नसतो, कला नसते पण आईच्या नजरेला मात्र त्या फुलं,अक्षर,तर कधी देवबाप्पाही दिसतो.
              तसंच हे अर्थहीन लिखाण, एका अनामिकाच्या डायरीतले. निव्वळ टाईमपास.


                निरर्थकाची डायरी -
  
      वाऱ्याला पाहून दिशा बदलणे योग्य असते असे सगळेच म्हणतात पण ते फक्त तग धरून राहण्यासाठी. जी झाडं वादळी वाऱ्यात दिशा बदलतात ती कमजोर झालेली,झोडपली गेलेलीच दिसतात.
       जी झाडं वाऱ्यातही ठाम राहतात ती महावृक्ष म्हणून ओळखली जातात. ती स्वत:चा आधार स्वत:च निर्माण करतात ती वटवृक्ष म्हणून पूजनीय ठरतात.
       प्रत्येक वेळी क्रियेला प्रतिक्रिया म्हणून आपले वागणे बदलले तर आपले असे काहीच उरत नाही.
        आपल्या रस्त्यावर, आपल्या विचारावर, आपल्या वागण्यावर ठाम असणे हेच मनाला खरे समाधान मिळवून देते.

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४