निरर्थकाची डायरी
छोटं मुल कागदावर रेघोट्या ओढतं, त्याला काही अर्थ नसतो, कला नसते पण आईच्या नजरेला मात्र त्या फुलं,अक्षर,तर कधी देवबाप्पाही दिसतो.
तसंच हे अर्थहीन लिखाण, एका अनामिकाच्या डायरीतले. निव्वळ टाईमपास.
निरर्थकाची डायरी -
वाऱ्याला पाहून दिशा बदलणे योग्य असते असे सगळेच म्हणतात पण ते फक्त तग धरून राहण्यासाठी. जी झाडं वादळी वाऱ्यात दिशा बदलतात ती कमजोर झालेली,झोडपली गेलेलीच दिसतात.
जी झाडं वाऱ्यातही ठाम राहतात ती महावृक्ष म्हणून ओळखली जातात. ती स्वत:चा आधार स्वत:च निर्माण करतात ती वटवृक्ष म्हणून पूजनीय ठरतात.
प्रत्येक वेळी क्रियेला प्रतिक्रिया म्हणून आपले वागणे बदलले तर आपले असे काहीच उरत नाही.
आपल्या रस्त्यावर, आपल्या विचारावर, आपल्या वागण्यावर ठाम असणे हेच मनाला खरे समाधान मिळवून देते.
Comments
Post a Comment