परतीच्या या वाटेवरती असेच काही घडते...
शब्द सारे मुके होती,डोळ्यांमध्ये पाणी भरते
सोडून जाता इथेच सारे,पाऊल ही डळमळते.।।
निसर्ग आणी त्याची महता,तूच वसतसी तीथे तत्वता,
तुझ्या रुपाने आयष्याचे सार्थक हे होते।।
तूच सावरते,तूच घडवते, तूच घड्यांना आकार देते,
तुच मांडतो,तूच मोडते,खेळ मोडूनी हाक मारते।।
तुझी महती जाणूनही,खेळामधेच मन अडकते.
परतीच्या या वाटेवरती असेच काही घडते।।
जीच्यासाठी केले सारे, तीच्यापासून मन दूर पळते,
परतीच्या या वाटेवरती असेच काही घडते।।
समस्यापूर्तीमधली कविता KVD
Comments
Post a Comment