Skip to main content

दुकानदारी---एक सहज सोपा व्यवसाय

      दुकानदारी---एक सहज सोप्पा व्यवसाय.
       आपल्या धंद्याची सूरवातच " मी माझा वेळ जाण्यासाठी चालू केला आहे" इथून होते. मग धंदा उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ आपल्या लहरीवर अवलंबून असते यात नवल ते काय ?
       आपला बिझनेस स्टडी काय असतो ? कोणता धंदा,व्यवसाय आपल्या जवळपास सुरळीत जोमाने चालू आहे ते बघायचे आणि त्याच्या बाजूलाच तोच व्यवसाय सुरु करायचा, शेजारच्याचे ५०% तरी ग्राहक आपल्याकडे येतीलच या विश्वासाने आणि मग हातखंडे प्रयोग चालू करायचे,स्वत:चा उद्योग वाढवण्यासाठी नाही बरं का, शेजाऱ्याचे दिवाळे निघावे यासाठी.
       व्यवसाय आणि कुटुंब,मित्रमंडळी यांना वेगवेगळे ठेवणे आपल्याला कधीच जमत नाही. तुमच्या व्यवसायाचा फायदा उठवायला सगळी असतात पण तुम्हाला मदत लागेल त्या गरजेच्या वेळी कोणीच धावून येत नाही.
      आपण वस्तू एमआरपी पेक्षा २ रु. जास्त घेवून विकतो आणि कोणी विचारलेच तर " आमचा हा रेट आहे,हवं घ्या" हा आपला रोखठोकपणा आपल्या तोंडात हजर असतोच.
       आपल्याला गिऱ्हाईकाकडून जास्तीत जास्त किंमत हवी असते आणि आपल्याला माल पुरवणाऱ्याकडून तो कमीतकमी किंमतीत पदरात पाडून घ्यायचा असतो, धंदा आहे फायदा बघणं हे कितीही खरे असले तरी, व्यवसाय ही एक साखळी असते, जोपर्यंत साखळीतले सर्व दूवे समाधानी असतात तो पर्यंतच धंदा सुरळीत चालू राहतो.
        पण आपण आपल्या समाधानासाठी मधले दुवे बदलत राहतो,त्यामुळे धंदाही अडखळत चालतो.
       आपल्या हातातील आनंदाच्या फुलाचा सुगंध कायमचा मिळायला हवा असेल तर फुलांनी भरलेली ओंजळ जरा लांब धरली पाहीजे,आपल्या बरोबरचे सर्वच जर त्या सुगंधाने प्रफुल्लित झाले तर तो सुगंध जास्तच आनंद देत राहतो.
       चला नव्याने व्यवसायात पडणारे मराठी तरुण कुठे चुकतात सांगा बघू.

अभय बापट

२१/०५/२०२२

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४