घ्यावे हातात वेचून आळवावरचेही पाणी, सावरावे घरटे आपुले सुटत्या निसटत्या क्षणी. क्षणात दिसते देखणे क्षणात दिसेनासे होते, सुख असेच असते दु:खाला घेवून येते. आनंदाचे क्षण क्षण मनापासून जपावे, दु:खाचे दान म्हणजे डाव देवाचा जाणावे. आळवावरच्या पाण्याला क्षणभंगुराचा साज, मनामध्ये जपावी त्याच्या मुळातली गाज. आयुष्यही असेच सारे चंचल क्षणांचे गान, मनामनात जपावे शाश्वत शब्दांचे भान. साधेसुधे शब्द माझे नाही अनुभवाचे दान, अळवावरचे पाणी जणू क्षणात जाती गळून. ----अभय बापट १८/०२/२०२६