प्रिय,
अभय.
तुला प्रिय म्हणावे का, चालेल का तुला? आपल्याला आवडत्या व्यक्तीचा उल्लेख आपण प्रिय असा करतो, अरे पण तू तर तुझ्या स्वत:वरच नाराज असशील तर प्रिय म्हणावे तरी कसे ?.
आयुष्यात काही निर्णय चुकतात, काहीवेळा अनपेक्षित निर्णय घ्यावी लागतात पण हेच तर जीवन आहे.
मध्यंतरी तूच तर पुस्तक ,"शल्य अधुऱ्या स्वप्नांचे" आणले होतेस, अनेक यशस्वा माणसांना कोणीतरी वेगळेच व्हायचे होते आणि त्यांचे करियर वेगळेच झाले तरी त्यांनी जीव ओतून कष्ट केले आणि यश खेचून आणलेच.
त्यातील अनेकांना तर शुन्यातून सुरवात करावी लागेल.
तूला नशीबाने उंच उडायला आयते पंख मिळाले, उंचावर पाय रोवायला भक्कम फांदीचा आधारही मिळाले. तु धडपडलास तर आधारला, सावरायला मदत करणारे हातही तुला नशीबाने तुझ्या आजूबाजूला मिळाले आहेत.
आपल्यातीलच एखादी जिद्दीने ४५ व्या वर्षी डॉक्टर होते, ते शिकताना वैमानिकाचे शिक्षण घेते, घोडेस्वारी शिकते.
कोणी भयानक आजारातून सावरुन जिद्दीने नर्मदा परिक्रमा करते.
कोणी मरण निश्चित झाल्यावर चारधाम यात्रा करत पुर्ण करतं.
ही अशी आपल्यातीलच उदाहरणे डोळ्यासमोर असताना, नाउमेद होण्याची हिंमत तरी कशी होते रे?
काही नवीन शिकायला वय कधीच आड येत नाही, जिद्द परिश्रमाची तयारी असते तर अनंत हात मदतीला तयार असतातच.
बघ विचार करा,अजूनही वेळ गेलेली नाही. यश नाहीच मिळाले तरी अनुभव नक्कीच मिळेल आणि हार न मानता प्रयत्न केल्याचे समाधान,आनंद तरी नक्कीच मिळेल, ज्यावर तुझा फक्त तुझाच हक्क असेल.
तुर्तास एवढेच......
Comments
Post a Comment