Skip to main content

संयम---कृष्ण

संयम, राधे,
            संयम,
           बोलला जाणारा प्रत्येक शब्द, घडणारी प्रत्येक घटना टिपकागदावरती पसरणाऱ्या शाईसारखी हळूहळू आपल्या मनावर आपला रंग सोडत असते.
           विचारपूर्वक बोलावे राधे आणि विवेकाने चालावे यातच स्वतःसह सर्वाचेच हित असते. प्रत्यक्ष ईश्वराला सुद्धा अवतार घेताना योग्य क्षणाची वाट संयमाने पहावी लागते राधे.
             राधे, लोखंडाच्या तुकड्यापासून हत्यार घडवणाऱ्या तो लोहाराचे निरिक्षण कर, संयमाचे अत्युत्तम उदाहरण आहे तो. योग्य तितके लाल होईपर्यंत संयमाने वाट पहात बसावे लागते मग घणाचा एकच घाव, योग्य वेळी,योग्य ठिकाणी, योग्य ताकदीने. तेव्हाच सुबक,धारदार शस्त्र तयार होते.
              योग्य क्षणी,योग्य प्रकारे केलेली कृती यश देते राधे, तो क्षण येईपर्यंत वाट पाहणे हाच कर्मयोग.
               राधे, संयम ही यशाची गुरुकिल्ली आहे,ती वापरला तरच बाकीच्या किल्ल्यांचा उपयोग, नाहीतर शिल्लक राहतात ते निष्फळ पर्यंत.
               राधे, शब्द उच्चारण्यापूर्वी,कृत्ती करण्यापूर्वी संयमपुर्वक विचार करावा राधे, नंतर मागे वळता येत नाहीच असे नाही पण कधीकधी त्यामुळे अतोनात नुकसान मात्र होते.

----- अभय बापट 

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४