आषाढस्य प्रथम दिवशी पावसाचा लागे लळा, चिखलामध्ये पाय रोवूनी वाट बघत बसतो बगळा. शब्दांची ती मासोळी बघ सरसर सरसर पळून जाते, चिखलामध्ये चोच खुपसूनी वाट बघत बसतो बगळा. मासोळी ती वेचून मग तो घरट्याकडे परत फिरतो पिल्लांसवे खाता खाता मग एक कविता गातो. शब्द,सृष्टी आणि पाऊसधारा वाहणारा अविरत वारा, काळे कुंतल,सुंदर मुखडा कालिदासाचा प्रभाव सारा. मग सारे धावून येती बगळ्याचे त्या सगे सवंगडी, संमेलन भरुन म्हणती मीच फाकडा, मीच फाकडा.