Skip to main content

मनूला पत्र

मने,
             सगळीच बोलतात "दुरुन डोंगर साजरे" दुरुन डोंगर कितीही रेखीव दिसत असले तरी ते दिसतात एकसुरीच, हिमालयाच्या शिखरांसारखी काही शिखरेच दुरुनही सुंदर दिसतात,त्यांच्यापासून दुर राहूनच त्यांचे सौंदर्य,भव्यता आदरानी अनुभवावी,नाहीतर बाकीच्या डोंगराजवळ जायला हवे, तरच त्यांच्या अंगाखांद्यावर खेळणारे निर्झर आणी त्यांनी ल्यालेली विविध रंगी वसने अनुभवायला मिळणारच नाहीत.
             माणसांच पण असंच असतं काही माणसंच असतात दिपस्तंभासारखी,त्यांच्या नुसत्या असण्यावरुन आपला मार्ग ठरवावा अशी.
             बाकीची माणसं मात्र जवळ जावून अनुभवावी.किती विविध रंग असतात स्वभावात लपलेली,खेळावी कधीतरी रंगपंचमी या रंगांचीही,निर्माण होईलही एक नवीनच लोभसवाणी शेड तयार.
             निसर्गाकडे जाण्याच्या नादात माणूस हा पण निसर्गाचा अविभाज्य घटक आहे हेच आपण विसरुन जातो मने, जवळ असणा-या माणसांना विसरून जावून दुस-या माणसांना निरखून बघण्यात एवढे गर्क असतो की आपल्या लक्षातच येत नाही,आपल्याला बरोबर मार्ग दाखवणारे दिपस्तंभ कुठे दुर नसतात,आपल्या आसपासच असतात.
(फेसबुक पोस्ट -११-६-२०१७)

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४