मने,
प्रत्येक जखम बांधून ठेवायची नसते, काही जखमा एवढ्या साध्या असतात की मोकळी हवाच तिच्यावर मलमाचे काम करते.
मने, दु:खाच्या गाठोड्यात स्वत:ला बांधून घेतल्याने दु:ख कमी होत नाही तर ते वाढतच जाते. आनंदी क्षणाची छोटीशी झुळूकही दु:खावर उतारा ठरु शकते.
प्रत्येक दु:खावरती पेनिसिलीन लावावे लागत नाही, कधी तुपाचे नाजूक बोट ही दुखणे कमी करते.
मने, हाताला खुपणारे कुस कधीतरी निघतेच , कधी मुद्दाम काढून टाकवे लागते, कधी आपोआप कामाच्या ओघात निघून जाते,कधी आजीच्या मायेच्या हळूवार स्पर्शानेही निघते. ते चांदण्याचे हात आपल्या आजूबाजूला असतातच वेगवेगळ्या रुपात फक्त ते हात हातात घ्यावे लागतात.
मने, दु:खाच्या ओघात का वहावत जावे, त्या प्रवाहात सुद्धा खंबीर रहावे दगडासारखे अविचल,दु:खाचा प्रवाह भेदत. बघ आनंदाचे कणकण वाहत येवून आजूबाजूला जमा होईल.
Comments
Post a Comment