Skip to main content

बोधकथा

जंगलचा राजा आजारी पडला, थकला, उपासमार होवू लागली,शेवटी त्याने शक्ती एकवटून एका काळविटावर झडप टाकली पण झाले उलटेच, झटपटीत काळविटाची शिंग लागून तो जखमी झाला,एक शिंग तर त्याच्या डोळ्यातच घुसले.
                 दुखण्यातून बरा झाल्यावर त्याने शिंग बंदीचा हुकुम काढला, जंगला लहानमोठ्या कोणत्याही प्रकारच्या शिंगाला बंदी. ज्यांना शिंग आहेत त्यांनी शिंग काढून टाकावीत.
                 सगळे शिंगवाले प्राणी जंगलचे राज्य सोडून बाहेर निघून गेले.
                 या गडबडीत एका सशाने आपली सावली बघितल, सावलीतले कान बघून तो घाबरला. त्याच्या मनात आले "शिपाई रानकुत्रांना हे कान शिंगंच आहेत असे वाटले तर ?"
                 घाबरुन तो ससा शेजारी राहणाऱ्या रातकिड्याकडे गेला आणि म्हणाला," मित्रा, मी अखेरचा निरोप घ्यायला आलोय, मी हे जंगल सोडून चाललोय".
                   किड्याने विचारले, "तुला कसली भिती ?"
                   ससा म्हणाला," माझे कान शिंगासारखे दिसले किंवा उद्या कानावरही बंदी आली तर ?"
                   रातकिडा भडकला,"अरे कान कुठे,शिंग कुठे ! मला काय बिनडोक समजतोस
काय ?"
                  ससा म्हणाला, ' मित्रा, हे शासन मनात येईल ते सिद्ध करेल. कान हे शिंगंच आहे असे कोर्टसुद्धा ठरवेल. कायदा गाढव असतो. मी ससा आहे,सशाला शिंग नसतात हे कळवळून सांगितले तरी ते मला दोन शिंगवाला गेंडाही ठरवतील, माझ्याविरुद्ध अनेक साक्षीदार उभे करतील आणि मला फाडून खातील. त्यापुर्वी या जंगलातून पळून जाण्याऐवजी दुसरा मार्ग नाही'.
   (१७ व्या शतकातील ला फॉन्तेन या लेखकाची बोधकथा- व्यंकटेश माडगूळकर यांच्या सरवा मधून)

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४