Skip to main content

ऑक्सिजन-वृक्ष आणि प्रदुषण

मने,
     झाले के तुमचे वृक्षारोपण करुन, यंदा ऑक्सिजनचे महत्व प्रकर्षाने लक्षात आले त्यामुळे वृक्षारोपणाचे कार्यक्रम यंदा जरा जास्तच चढाओढीने राबवले जातातायत. जून-जुलैमध्ये अतीपावसाच्या दिवसात लावलेली रोपं किती तग धरतात हा एक संशोधनाचा विषय आहे.
       मने, फक्त वृक्षारोपण केलं की आपण ऑक्सिजनच्यासाठी काही करण्याची गरज नाही हा विचारमात्र पुर्णपणे चुकीचा आहे.
        पृथ्वीवरचा पन्नास टक्के ऑक्सिजन तर समुद्रापासून मिळतो, समुद्रातील एकपेशीय वनस्पती हा ऑक्सिजन आपल्याला पुरवतात. या वनस्पतींचा सर्वांत मोठा शत्रू आपणच नकळत त्यांच्यापर्यंत पोचवत असते.
          जवळपास ६० हजार वेगवेगळ्या प्रकारची केमिकल्स समुद्राच्या पाण्यात सोडली जातात, आपण कचरा म्हणून टाकलेला एक वर्तमानपत्राचा कागद, एक निरुपयोगी ठरलेली औषधाची गोळी, सिंन्थेटिक कापडाचा एक तुकडा, एक प्लॅस्टिकची पिशवी हे सर्व केमिकल नदीमार्फत, गटारामार्फत समुद्रापर्यंत पोचवले जाते. त्या प्रदुषणामुळे समुद्रातील या वनस्पती संकटात सापडतायत पण हे सर्व समुद्र आपल्याला साभार परत करत असतो.त्यामुळे या सर्वाचा आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होतोच.
      मने, वनसंवर्धनाबरोबरच ही केमिकल्स कमीतकमी प्रमाणात आपल्यामुळे निसर्गात टाकली जातील हे बघितले पाहीजे. घरातील कचऱ्याचे सुयोग्य व्यवस्थापन हे आर्थिक व्यवस्थापना एवढेच महत्वाचे आहे हे जाणले तरच पुढच्या पिढीला समृद्ध जीवन मिळू शकेल हे आपण लक्षात घेतले पाहीजे.
      

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४