व्यंकटेश माडगुळकरांनी एका ठिकाणी अस्वलाबद्दल लिहीले आहे. अस्वलाला बहावाच्या शेंगा अत्यंत प्रिय,पण बहावा सारक असल्यामुळे या प्रिय गोष्टींमुळेच अप्रिय वेदनांना त्याला सामोरे जावे लागते, "आम्ही जातो आमुच्या गावा" सिनेमातील मधु आपटेंप्रमाणेच.
मग ते अस्वल निश्चय करते,बहावाकडे बघायचेही नाही,दोन-चार दिवस सरतात,निश्चय डळमळीत होवू लागतो,बहावाचे झाड हिरव्यागार शेंगा हालवत साद घालतच असते," हवास तू, हवास मज तू, हवास तू "
"आपला काय आपल्या मनावर ताबा नाही "? असा विचार करत "एकच शेंग खाऊ" असे मनाला बजावत अस्वल झाडाजवळ जाते आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या......
आपले पण त्या गोष्टीतला बहावा आणि अस्वला सारखेच होते, फेसबुक म्हणजे बहावाचे झाडे, सुंदर पोस्टनी, फोटोंनी सजलेले,हिरव्यागार वेड लावणाऱ्या शेंगा हात हलवून साद घालत असतात.
आपला निश्चय थोडावेळ टिकतो, आपण पुन्हा पुन्हा "मला व्यसन नाही लागलय,पाच मिनिटं तर बघणार" असे मनाला बजावत इथे येतो,अडकून पडतो
आणि, पुन्हा येरे माझ्या मागल्या.
तोच आनंद,तोच राग-द्वेष, तीच ओढ, अगदी गुंतून पडतो पुन्हा नव्याने निश्चय करे पर्यंत.
Comments
Post a Comment