Skip to main content

Posts

Showing posts from December, 2021

गुन्हा नव्हे

जे जे आहे ते तसे सांगणे गुन्हा नव्हे चुकले असेल तर कान धरणे गुन्हा नव्हे. चुकून असेल पडला पाय वादळवाटेवर योग्य मार्ग पुन्हा निवडणे गुन्हा नव्हे. हुकले वसंत आयुष्याचे प्रत्येक वेळी कधीतरी अत्तर खरीदणे गुन्हा नव्हे. आयुष्याचे मर्म समजण्या उशीर झाला वेळेवरती घड्याळ बघणे गुन्हा नव्हे. बदलतात ऋतू आजकाल उलटेसुलटे सावरण्या पंख पसरणे गुन्हा नव्हे. १/१/२०२२

करावे लागतेच

आतून तुटून जाताना सजावं तर लागतचं, आतून उभारी याणेसाठी भजावं तर लागतचं. नसतंच सर्व कायम आपलं जपावं तर लागतचं, गेलं विरुन जरी काही स्मरावं तर लागतचं. आपलं आपलं म्हणण्याआधी जोखावं तर लागतंच, नाही आपलं समजून सुद्धा जगावं तर लागतंच. आयुष्यात ऋतू एकदाच येतो फुलावं तर लागतचं, नेलं लुटून वादळाने तरी तगावं तर लागतंच.

आईची नजर

दु:खाच्या काफिल्यातून सुखाचे सोयरे, दाखविण्या पायवाट आनंदाची. काळ्याभोर ढगाला सोनेरी किनार, पोळल्या मनाला थोडासा आधार. सुख सुख म्हणजे दुजे काही नाही, आपुलकीची ओढ नजरेतून शब्द सारे द्वाड शब्द सारे वेल्हाळ, नजरेत मकरंद नात्याचा. आईची नजर मायेचा पाझर, तृप्तीचा हुंकार हृदयात.

सुखाचे सोबती

अजूनही सारेच जग हे सुगंधाचे गीत गाती कुस्करलेल्या पाकळ्यांना ना मिळे सद्गती. उगवत्या सूर्याच्या साठी सारे जन अर्ध्य देती विस्कटलेल्या रात्रीची व्यथा ना कोणी पुसती. यशाच्या पायरी वरती हात सारे मिळवती अपयशाच्या प्रयत्नांची का वाटे लाज ती. सुखाचे सोबतीच येती बघ सुगीच्या शेवटी घरट्यातले पक्षी सारे वाळवंटी उडून जाती. असेच चाले जग आणि अशीच जगरहाटी एकट्याने यावे आणि एकटेच असतो शेवटी.

बघ मित्रा

कितीही रंग तुझ्या स्वप्नात असतील मित्रा पैशाच्या सावलीतच फुलतो इतिहास मित्रा नको धावूस सैरावैरा वाटेवर असा उगाच तू कुणाजवळ नाही तुझ्यासाठी वेळ मित्रा. संकल्प आणि सिद्धी जोडीने शोभती जरी त्यासाठी लागते धरावी प्रयत्नांची कास मित्रा. वर्ष बघ चालले शेवटच्या दिवसाकडे हळुहळु कॅलेंडर बदलणे एवढेच आपल्या हातात मित्रा.

सुख समाधान

समाधानाच्या झाडाखाली सुखाचे रोप रुजतं, त्या सुखाच्या झाडाला आनंदाचे फळ गोमटं. असे आगळं चक्र भाळी देवानं गोंदवलं, सुख समाधानानं  सारं विश्व व्यापलं.

देव माझा

शब्दांच्या ही पल्याड आहे एक गाव तेथे वेशीपाशी आहे माझा देव. घनगर्द काळोखाची आरती मी ओवाळीते मुक्यानीच भावनांचे अर्ध्य त्याला देते. जाणतो सर्व काही नको शब्द वाया नम्रतेचा लागे त्याच्या माथी टिळा. कशाला असावी सहवासाची भुक तोच तो समर्थ माझ्या मध्ये आहे. नको फुल पाने नको धुप दाणी नेत्रांची आरती त्याला मिरवीते अशी धन्य झाले त्याचीया कृपेने अवघीची झाले त्याच्या कटाक्षाने.

सोबत

वस्त्रातील एखादा धागा कमकुवत झाला,तुटला,विरत चालला ते वस्त्र नजरे समोर नकोसे होते, शक्य असेल तर तो धागा आणि त्या धाग्याला जोडले गेलेले बाजूचे धागे कापून वेगळे केले जातात, तसेच नाळ कापणे कुठे कठीण असते.                         दुष्काळ जीवघेणा असतोच पण दुष्काळाची चिन्ह दिसत असताना आपण आता काही करू शकत नाही ही हतबलता जास्त जीवघेणी असते, कुरतडत कुरतडत वाट पाहायला लावणारी. अटत चाललेल्या तलावातील माशांसारखीच.                         सजीवांची उत्क्रांती ठरलेल्या नियमांनुसार होते आणि ते अनंत काल चालणारे चक्र आहे. पण मनाची उत्क्रांती?                          थोडासा विचार, थोडासा विवेक आणि ॲटजेस्ट करण्याची वृत्ती वेळीच जोपासली तर मन उत्क्रांत होवू शकते. रुक्ष एकाकी वाळवंट टाळता येवू शकते, मृगजळाचा शोध घेत वणवण फिरणे नशीबी येत नाही.                        ...

आवर....

स्वत:भोवती काटेरी कुंपण घातले मी एकट्याला एकट्याने एकटे ठेवले मी नको आता अधिक उकळी भावनांना लोण्याला विस्तवापासून दूर राखले मी तिच्याच साठी ती वाट निवडली होती तिच्याच साठी वाटेवर जाणे सोडले मी. ही वेडी वळणे नवीन नाहीत इथे कुणा त्या रस्त्यावर पाऊल टाकणे सोडले मी. अजिंक्य आहेत म्हणे इच्छा मानवाच्या इच्छांना शरण जाणे कधीच सोडले मी.

घडले असे काही.....

तुझ्या साच्यातून काढले बेतले मुखवटे नवे, माझा असा मी जराही आता उरलोच नाही. जे मलम वाटले मनाला तेच बनले दु:ख जीवाचे, उन्हानीही आग इतकी कधी ओकली नाही. वाट होती बिकट आणि पाऊले नाजूकशी, तेव्हा जरासे सावरताना जीव माझा ओतला. ती होती मी ही होतो आणि वाट धुक्याने भारलेली, सुटला हात हातातून आणी साथ रस्ताने सोडली. वाटले जुळतील पुन्हा रस्ते वेगळे जरी, घेतलेल्या शपथांना जरी हजार फाटे फुटले.
एक शब्द,एक वाक्य ओठांआड अडतं, जिवन गाणं बनण्यासाठी आयुष्यभर झगडत राहतं. एक आवंढा, एक असू रेषे आड अडकतं, मोकळं होण्यासाठी ओलावा शोधत राहतं. एक व्यक्ती,एक स्वप्न हृदया बाहेर राहतं, हृदय मग स्वागतासाठी छाया धरुन बसतं. एक हुंदका,एक भावना ओठांआड गोठतो, पुढच्या साऱ्या आयुष्यात मनावरचे ओझं होते. एक क्षण,एक निमिष चुक बनून राहतं, दुरुस्त करु बघता सारं आयुष्य सरतं.

वैद्यक विज्ञान- हिंदुस्थान आणि युरोप

१८ व्या शतकाची सुरवातीची दशक. ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नाही अशा इंग्लीश लोकांच्या स्वत:च्या देशात काय परिस्थिती होती .                    आधुनिक आरोग्य विज्ञान विकसित झाले नव्हते. ॲण्टिबॉयोटिक्सचे युग खुप दूरच होती. खुद्द इंग्लंडमध्ये ५०% मुलं जन्माला आल्यानंतर एकावर्षातच मृत्यूमुखी पडत होती. नामकरण विधींपेक्षा दफनविधींचे प्रमाण जास्त होते.                    अठराव्या शतकात ब्रिटनमध्ये मूल विविध रोगांबरोबरच कुपोषण,दुर्लक्ष , बाल संगोपनाविषयी अज्ञान यामुळे मृत्यूमुखी पडत होती.                    प्रौढ आयुष्यातही साथीचे आजार, बाळंतपणात स्त्रीयांचा मृत्यू याचे प्रमाण भयानक होते.                    त्याकाळात इंग्रजांनी हिंदुस्तानात हातपाय रोवायला सुरवात केली. हिंदुस्थानातील एकही क्षेत्र असे नसेल ज्याच्या अभ्यास करुन इंग्रज किंवा युरोपियन त्यात प्राविण्य मिळवले नाहे. अगदी वेदांपासून,...

वाट

कोणीतरी देईल आनंदाचे दान म्हणून हे मन व्याकुळले. आशेचे किरण डोळ्यांमध्ये जग अवघे पंचप्राण एकवटले. देई हाती हात सोबतीची साथ, चालू पायवाट एकसंगे. कल्लोळ मनात कल्लोळ स्वप्नात पाहे तीची वाट जिवभावे.

वंचना--त्याची व्यथा

लवकर उठावे,गोठवणाऱ्या थंडीतही थंडगार पाण्यात बुडबुड कावळ्यासारखी बुडी मारुन अंघोळ उरकावी, आरशात बघून आपले चमकदार केस नीट विंचरावे आणि तयार व्हावे तिच्याचसाठी.           शतनुशतके,हजारो वर्ष हेच ते आणि हेच ते. तिच्यासाठी चंद्र आणि तारे, तिच्यासाठी सारे ऋतूंचे पसारे.           तिच्यासाठी पुन्हा पुन्हा नव्याने धुक्याची दुलई विणावी, तिच्या सर्वांगाची तलखी थांवण्यासाठी शॉवर बसवून द्यावा.           तिला नटण्यामुरडण्याची भारी आवड म्हणून रंगीबेरंगी फुले उमलावीत, तिच्या शृंगारासाठी चंद्रकिरणांचे शितल क्रिम बनवून द्यावे. अमावास्येचे काजळ घोटून द्यावे.           ती चोवीस तास ऑनलाईन असते त्यामुळे जास्तीतजास्त वेळ ऑनलाईन राहण्याचा प्रयत्न करावा, अगदी दुसरीकडे जावे लागले तर आपल्या मित्राची चंद्रकांताची मदत घ्यावी. अगदी फेसबुकवरच्या प्रेमवीरासारखे.           निव्वळ आपण आखलेल्या राजमार्गावरती कोणी धुमकेतूसारखे उगवून त्या राजमार्गावर शॉर्टकटने वहिवाट लावू नये म्हणून.    ...

व्यसनाधीनता

कुठल्यातरी नप्रेमकथेत वाचले "प्रेमाचे ही व्यसन असते".               तेही कधीही न सुटणारे व्यसन.              दारु सारखंच, शेवटपर्यंत सोबत .              लहानपणी फक्त दिसणं आवडत, सुरवातीला दारुची बाटली आवडावी तशीच, नाविन्याची ओढ, बाह्य सौंदर्यातच गुंतून पडण्या इतपतच.              काही वर्षांनी सोनसळी रंग,तेज मनाला आकर्षित करते.              नंतरचा काळ येतो तो सुबक आकार ओढ लावण्याचा, तारुण्याची सुरवात. मी एकाकडे त्याकाळातल्या वेगवेगळ्या आकाराच्या बाटल्या आणि फोटो जमवलेले बघितले आहेत.              मग येत चव, चव आवडणे ही गुंतत जाण्याची सुरवात दोन्ही प्रकारच्या व्यसनात.              मग येते ती त्यापासून मिळणारी उत्तेजना ,फायदे बघण्याची वेळ, माणूस तरुणपणाच्या मध्यावर असतो. स्थिरस्थावर होण्यासाठी योग्य ते शोधत असतो.         ...

संभ्रमात हरवलेला रस्ता

 चालावे की उभे रहावे हा एकच सवाल आहे.  ह्या संभ्रमाच्या वाटेवर तापलेल्या हवेवर हेलकावत तुटलेले पान होऊन भिरभिरावे निःसंगपणे की टाकून द्यावे अंग तप्त भुमीवर ? आणि करावा शेवट अस्तित्वाचा मनातल्या...? माझा तुझा ह्याचा अन त्याचाही. एकाकीपणाचे हलाहल भरुन घ्यावे उरामध्ये… की नंतर असणाऱ्या जिवंतपणाला नसावा स्पर्श अमृताचा कधीही.. पण मग.. पण मग त्या त्या अस्तित्वाला ही ग्रहण लागलं तर….? तर…तर… इथेच मेख आहे.नव्या लोकांच्या अनोळखी जंगालात प्रवेश करण्याचा, धीर होत नाही म्हणुन आम्ही जपत रहतो जुने आपलेपण.. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने उपेक्षांचे प्रहार… अस्तित्वाच्या गाभा-यात असणा-या मी पणाचा अंत.. आणि अखेर शरण जातो खालच्या मानेन भुतकाळाच्या दाराशी. विधात्या.. तु इतका कठोर का झालास? एका बाजुला आम्ही ज्यांना प्रेम दिले ते आम्हाला विसरतात आणि दुस-या बाजुला ज्याने आम्हाला प्रेम दिले तो तु हीआम्हाला विसरतोस. पण मग विस्कटलेल्या आठवणींचे हे सापळे घेऊन हे करुणाकरा… आम्ही कोणाच्या दारावर डोक आदळायच? कोणाच्या दारा ? कोणाच्या ? कोणाच्या??? मामा वरेरकारांसारख्या प्रख्यात नाटककार,जगन्मित्र,कोट...

सुगंधी कोपरे

          काही सुगंधी कोपरे आयुष्यभर तसेच जपायचे असतात.            प्रत्येकाला नाही जमत जूने कोपरे झाकून ठेवून वाऱ्याबरोबर वहात येणाऱ्या नव्या सुगंधापाठी दिशाहीन वाहवत जाणे, गळून पडलेल्या पिसासारखे.           या आठवणींचे कोपरे मनातील असो वा घरातील जपावेच लागतात स्वत:साठी,फक्त स्वत:च्या आनंदासाठीच.           कधीतरी त्या कोपऱ्यात डोकावायचे कोणाच्याही नकळत, कधी स्वत:च्याही नकळत आणि भरभरुन घ्यायचा सुगंध श्वासामध्ये, त्या आठवणीतल्या रातराणीसकट, सुगंधी करुन टाकायचं अस्तित्व स्वत:च, रात्रीतल्या एकाकी स्वप्नासारखे.

जाता जाता

आयुष्याचे मर्म समजले जाता जाता व्यथांनीही साद घातली जाता जाता. किती रंग बदलले देवांनीही धरणीवरती माणसांनी सत्त्व जपले जाता जाता. भ्रमाचे डोंगर रचले स्वत: भोवती सत्याची ओळख विसरले जाता जाता. मार्ग किती ते पक्षांचे ही दाण्यासाठी घरट्याकडे अचूक वळती जाता जाता. जगण्यासाठी सर्व लुटले जगताने या श्वासांचीही किंमत केली जाता जाता ओलावा अजून टिकून आहे धरणीवरती किती उन्हाळे असेच सरले जाता जाता. आयुष्याचे दान मिळाले फुकट सारे उधळून ते रिक्त झालो जाता जाता. डोईवरी आता उन्हाळा कायमचा तो छत्र धरणारे हात सुटले जाता जाता.

रात गेली

पहाटे जाग आली, संपून रात गेली एकट्या एकट्याने, सोडून रात गेली. प्राजक्ता सारखी अलगद,ओघळून रात गेली टांगलेली स्वप्ने उशाशी, खुडून रात गेली. ती माझीच होती अन मी होतो तियेचा, जोडणारु ती श्रृंखला, तोडून रात गेली. लपवलेले डंख मनाचे,जे एकट्याचे होते कुरवाळून त्यांना, दुखावून रात गेली. झुंझुरक्या वेळी, पायी भरुन वारा दिशा दिवसाची,दाखवून रात गेली.

कौतुक

तुझे कृत्य,तुझे कर्म... तुम्हीच सांगा कसे विसरावे.. तुमच्या एकेका शब्दा वरती मन आमचे वेडे व्हावे. तुझी नजर, तुझे विभ्रम तुम्हीच सांगा कसे विसरावे... तुझ्या एकेका श्वासा वरती मन आमचे डोलावे. तुझे शब्द,तुझे बोल तुम्हीच सांगा कसे विसरावे... तुझ्या एकेका उच्चाराने मन आमचे भरुन यावे. तुझी लज्जा, नजर झुकवणे तुम्हीच सांगा कसे विसरावे... तुमच्या एका दर्शनाने मन आमचे रंगून जावे. तुझी साथ,तुझी संगत तुम्हीच सांगा कसे विसरावे.. तुमच्या नुसत्या आठवणींनी मन आमचे तृप्त व्हावे.

ऐ गझल

ऐ गझल,तू कभी तो मेरे शब्दों मे ढल जा आसूंओं को मेरे भी कभी तेरा कफन मिले।

आशा

आसवांना माझ्या अजूनही थोडीशी खंत आहे, पुर्णपणे विरक्त होण्या मी कुठे संत आहे. भोगले जे दिधले दैवाने ओंजळीत माझ्या दैवावर स्वार होण्या मी कुठे महंत आहे. मिळवले हात नेहमी जे भेटले तयांशी आयुष्य अजूनही माझे, असे कसे संथ आहे. केला होता करार त्याने सोबतीच्या माझ्या आशा अजूनही अंतरी थोडीशी जिवंत आहे. वाट पाहण्यासाठी अजूनही थोडी उसंत आहे तरीही कुठेतरी जिवनाला ठरलेला अंत आहे.

नाते अनामिक

या चंद्राचे त्या किरणाशी असे अनामिक नाते, किरणाच्या नुसत्या स्पर्शाने याचे प्रकाशित होणे. युगानुयुगे चालले हे किरण आणी धरेचे नाते, तिच्याच मुळे फुलणे  तिच्याच पायी स्तब्ध होणे. चंद्राचे एकाकीपण  कोळाखाने वेढलेले, किरणांच्या गोंजारण्याने कलेकलेने वाढत जाणे. आकाश आणि धरतीचे नाते न दिसता ही मानलेले, तसे तुझे नी माझे प्राक्तन एकमेकांशी जोडले जाणे.

येता तुझ्या कुशीत

शब्द आणि चित्र एकाच दिवशी मिळावे यासारखा आनंद नाही तु फुल अमृताचे,मी निर्माल्य सुकृताचे पुन्हा सुगंध मिळाला,येता तुझ्या कुशीत. तू पुत्र अमृताचा, मी मानवी विकार नवजन्म लाभला तो,येता तुझ्या कुशीत. तु शिखर पर्वताचे, मी वाळवंटी विखार स्वर्गभुमी झालो, येता तुझ्या कुशीत. तू ज्ञान देवाघरचे, मी अज्ञान मानवाचे ज्ञानरुप झालो,येता तुझ्या कुशीत.