वस्त्रातील एखादा धागा कमकुवत झाला,तुटला,विरत चालला ते वस्त्र नजरे समोर नकोसे होते, शक्य असेल तर तो धागा आणि त्या धाग्याला जोडले गेलेले बाजूचे धागे कापून वेगळे केले जातात, तसेच नाळ कापणे कुठे कठीण असते.
दुष्काळ जीवघेणा असतोच पण दुष्काळाची चिन्ह दिसत असताना आपण आता काही करू शकत नाही ही हतबलता जास्त जीवघेणी असते, कुरतडत कुरतडत वाट पाहायला लावणारी. अटत चाललेल्या तलावातील माशांसारखीच.
सजीवांची उत्क्रांती ठरलेल्या नियमांनुसार होते आणि ते अनंत काल चालणारे चक्र आहे. पण मनाची उत्क्रांती?
थोडासा विचार, थोडासा विवेक आणि ॲटजेस्ट करण्याची वृत्ती वेळीच जोपासली तर मन उत्क्रांत होवू शकते. रुक्ष एकाकी वाळवंट टाळता येवू शकते, मृगजळाचा शोध घेत वणवण फिरणे नशीबी येत नाही.
पण, योग्य वेळी निर्णय घेता आला पाहीजे, निर्णय चुकाचा की बरोबर हे पुढे जावून कळतेच पण म्हणून निर्णय घेणे टाळणे हाच खरा मुर्खपणा.
आकाशात ढग असतानाच कृत्रिम पावसाचा प्रयोग केला तरच त्याला अर्थ असतो.
योग्य वेळेची वाट न बघता, वेळीच योग्य निर्णय घ्या.
वठलेली शाल्मली ही जोडीनेच छान दिसते.
Comments
Post a Comment