Skip to main content

सोबत

वस्त्रातील एखादा धागा कमकुवत झाला,तुटला,विरत चालला ते वस्त्र नजरे समोर नकोसे होते, शक्य असेल तर तो धागा आणि त्या धाग्याला जोडले गेलेले बाजूचे धागे कापून वेगळे केले जातात, तसेच नाळ कापणे कुठे कठीण असते.
                        दुष्काळ जीवघेणा असतोच पण दुष्काळाची चिन्ह दिसत असताना आपण आता काही करू शकत नाही ही हतबलता जास्त जीवघेणी असते, कुरतडत कुरतडत वाट पाहायला लावणारी. अटत चाललेल्या तलावातील माशांसारखीच.
                        सजीवांची उत्क्रांती ठरलेल्या नियमांनुसार होते आणि ते अनंत काल चालणारे चक्र आहे. पण मनाची उत्क्रांती? 
                        थोडासा विचार, थोडासा विवेक आणि ॲटजेस्ट करण्याची वृत्ती वेळीच जोपासली तर मन उत्क्रांत होवू शकते. रुक्ष एकाकी वाळवंट टाळता येवू शकते, मृगजळाचा शोध घेत वणवण फिरणे नशीबी येत नाही.
                        पण, योग्य वेळी निर्णय घेता आला पाहीजे, निर्णय चुकाचा की बरोबर हे पुढे जावून कळतेच पण म्हणून निर्णय घेणे टाळणे हाच खरा मुर्खपणा.
                        आकाशात ढग असतानाच कृत्रिम पावसाचा प्रयोग केला तरच त्याला अर्थ असतो.
                        योग्य वेळेची वाट न बघता, वेळीच योग्य निर्णय घ्या.
                        वठलेली शाल्मली ही जोडीनेच छान दिसते.

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४