१८ व्या शतकाची सुरवातीची दशक. ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नाही अशा इंग्लीश लोकांच्या स्वत:च्या देशात काय परिस्थिती होती .
आधुनिक आरोग्य विज्ञान विकसित झाले नव्हते. ॲण्टिबॉयोटिक्सचे युग खुप दूरच होती. खुद्द इंग्लंडमध्ये ५०% मुलं जन्माला आल्यानंतर एकावर्षातच मृत्यूमुखी पडत होती. नामकरण विधींपेक्षा दफनविधींचे प्रमाण जास्त होते.
अठराव्या शतकात ब्रिटनमध्ये मूल विविध रोगांबरोबरच कुपोषण,दुर्लक्ष , बाल संगोपनाविषयी अज्ञान यामुळे मृत्यूमुखी पडत होती.
प्रौढ आयुष्यातही साथीचे आजार, बाळंतपणात स्त्रीयांचा मृत्यू याचे प्रमाण भयानक होते.
त्याकाळात इंग्रजांनी हिंदुस्तानात हातपाय रोवायला सुरवात केली. हिंदुस्थानातील एकही क्षेत्र असे नसेल ज्याच्या अभ्यास करुन इंग्रज किंवा युरोपियन त्यात प्राविण्य मिळवले नाहे. अगदी वेदांपासून, भारतीय भाषा,इतिहास, संस्कृती,लोककथा, लोक समजूती, सर्व विषयात ते तेवढे पारंगत झाले की त्यांनी केलेल्या/लिहीलेल्या अभ्यासाचा उल्लेख आजही या विषयांवरती अभ्यास करणारी लोकं आधार मानतात.
आपल्या देशातील आरोग्य व्यवस्था त्या मानाने खुप चांगली होती, ती आयुर्वेदाच्या आणि वनौषधींचा वापर करणाऱ्या गावोगावच्या वैद्य मंडळीमुळे,प्रसुतीशास्त्र न शिकतासुद्धा त्या विषयात पारंगत असणाऱ्या सुईणींमुळे. बाल आणि शिशु संगोपनाबाबत घरोघरच्या जेष्ठांना असलेल्या ज्ञानामुळेच.
नंतर हे सर्व आपल्या हातून निसटू दिले आणि त्याच वेळी युरोप मात्र वैद्यकिय ज्ञानाच्याबाबतील विकसीत होत गेली.
आपल्या आयुर्वेदाचा, वनौषधींचा अभ्यासाने त्यांच्या आधुनिक वैद्यक विज्ञानाच्या विकासाचा पाया घातला असेल का ?
Comments
Post a Comment